प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक

इमेज
  श्रीमती मैनाबाई मुळाटे यांचे निधन; आज अंत्यसंस्कार प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांना मातृशोक परळी वैजनाथ :  परळी शहरातील जुने प्रेस कामगार रामभाऊ मुळाटे यांच्या मातोश्री तथा वैद्यनाथ गल्ली, परळी वैजनाथ येथील रहिवासी (सध्या मुक्काम योगेश्वरी कॉलेजच्या पाठीमागे, अंबाजोगाई) श्रीमती मैनाबाई वीरभद्र मुळाटे वय 88 वर्ष यांचे आज दिनांक ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४ वाजता बोरुळ तलाव येथे करण्यात येणार आहे. श्रीमती मैनाबाई मुळाटे या अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाच्या असल्यामुळे परिसरात सर्वपरिचित होत्या. कोष्टी समाजाच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांत त्या सक्रिय सहभाग घेत असत. पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी त्या नित्यनेमाने जात असत, अशी त्यांची धार्मिक वृत्ती होती. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धर्मापुरीत प्रतिपादन ; अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

नामस्मरण, शुद्ध विचार आणि सुसंस्कार हेच खरे रामराज्य – लिंबाजी महाराज तिडके




धर्मापुरीत प्रतिपादन ; अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :

     माणसाने काळानुसार बदलले पाहिजे, परंतु आपल्या संस्कृतीची व अध्यात्माची कास सोडू नये. कीर्तन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून मन शुद्ध करण्याचा आणि जीवनाला योग्य दिशा देण्याचा प्रभावी मार्ग आहे. नामस्मरण, शुद्ध विचार आणि सुसंस्कार यांमुळेच खऱ्या अर्थाने ‘रामराज्य’ प्रत्येकाच्या जीवनात निर्माण होऊ शकते,” असे प्रतिपादन ह.भ.प. लिंबाजी महाराज तिडके यांनी धर्मापुरी येथील श्री क्षेत्र रोकडेश्वर देवस्थानद्वारा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा हनुमान चालीसा पारायण सोहळ्यानिमित्त आयोजित कीर्तन महोत्सवात केले.

“झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरती धरी पिके ओसंडती गाई म्हशी” या संतवाणीतील अभंगावर प्रतिपादन करताना महाराजांनी रामराज्याची व्यापक संकल्पना उलगडून सांगितली. रामराज्य म्हणजे केवळ ऐतिहासिक कल्पना नसून प्रत्येकाच्या जीवनात साकार होणारी मूल्यव्यवस्था आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या घरात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदते, जिथे प्रेम, आदर आणि परस्परांतील स्नेह जपला जातो, तेथेच खरे रामराज्य अवतरते. प्रत्येकाने आपल्या आचरणात सकारात्मक बदल घडवून आणत सद्विचार, सदाचार आणि नामस्मरण यांचा अवलंब केल्यास समाजातही रामराज्याची अनुभूती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

तसेच यावेळी बोलताना त्यांनी साधू-संतांचे विचार जीवनात अंगीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. काळाच्या ओघात समाज झपाट्याने बदलत असून अनेक चांगल्या गोष्टींसोबतच नकारात्मक प्रवृत्तीही वाढताना दिसतात. दररोज विविध वाईट व अंधश्रद्धेच्या गोष्टी कानावर पडत असताना विवेकबुद्धी जागृत ठेवून अशा गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. सत्कर्म, नामस्मरण आणि भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवून जीवन जगल्यास प्रत्येक संकटावर मात करता येते, कारण भगवंत कायम आपल्या सोबत असतो, असा संदेश त्यांनी दिला. यावेळी धर्मापुरीसह परिसरातील भाविक व भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!