MB NEWS-परळी शहरातील लसीकरणाचा गोंधळ थांबवून नागरिकांची गैरसोय दूर करा-श्रीनिवास देशमुख

 -------------

परळी शहरातील लसीकरणाचा गोंधळ थांबवून

नागरिकांची गैरसोय दूर करा-श्रीनिवास देशमुख

-------------



परळी वैजनाथ, दि.11, (प्रतिनिधी) ः-

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या सुरू असलेल्या लसीकरणाचा गोंधळ त्वरित थांबवून लसीकरणाचे नियोजन करून सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी   सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास देशमुख यांनी केली आहे.

परळी शहर व तालुक्यात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी परळी शहरात तीन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रावर वेळेवर लस पुरवठा होत नाही. आणि ज्या दिवशी लस दिली जाते त्या दिवशी कसलेही नियोजन केले जात नाही. सर्वसामान्य नागरिकांना कडक उन्हात तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर नेहमीच लस संपल्याची कारणे पुढे केली जातात. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सावली नाही यामुळे येथे गैरसोय अधिकच होत आहे. 45 वर्षावरील व त्याखालील नागरिकांच्या लसीकरणात पहिला व दुसरा डोस याचे नियोजन नाही. याकडेही संबंधितांनी लक्ष द्यावे, शहरातील लसीकरणाचा सुरू असलेला गोंधळ करावा अशी मागणी श्री देशमुख यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !