विशेष लेख >>>>प्रवीण टाके (उपसंचालक, (माहिती)विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर)

इमेज
  चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !       ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम आवाहन केले. त्यांनी देशवासियांना केलेले आवाहन हे केवळ खर्च कमी करण्याचे नाही, तर राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक ...

महत्त्वाची व्यावसायिक संधी :

महत्त्वाची व्यावसायिक संधी : परळी वैजनाथ नगर परिषदेकडून व्यापारी संकुलातील दुकानांचा ई- लिलाव जाहीर ; २७ दुकाने उपलब्ध




परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        परळी वैजनाथ नगर परिषदेकडून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील दुकानांच्या सार्वजनिक ई-लिलावाची घोषणा करण्यात आलेली आहे. शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी  सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, या ठिकाणी २७ दुकाने उपलब्ध आहेत.इच्छुक व्यापाऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविता येणार आहे.

          नगर परिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपल्या आवडीच्या दुकानाची पाहणी करून नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या अधिकृत www.mahatenders.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तसेच डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, शॉप अ‍ॅक्ट परवाना अथवा उद्योग प्रमाणपत्र आणि नगरपालिकेचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष ई-लिलाव प्रक्रिया २९ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहे. निविदा शुल्क ५ हजार रुपये (ना-परतावा) तर अनामत रक्कम ५० हजार रुपये (परतावा) ठेवण्यात आली आहे.

        प्रत्येक दुकानासाठी स्वतंत्र टेंडर भरावे लागणार असून सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यापाऱ्यास दुकान सोपविण्यात येईल. प्रत्येक दुकानाचे शासकीय मूल्यांकन किमान २० लाख रुपयांपासून पुढे निश्चित करण्यात आले आहे. निवड झालेल्या निविदाधारकांनी एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम ३० दिवसांच्या आत भरावी लागणार असून उर्वरित ५० टक्के रक्कम पुढील ६० दिवसांत दोन टप्प्यांत जमा करावी लागणार आहे. संपूर्ण रक्कम भरण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या व्यापारी संकुलात एकूण २७ दुकाने उपलब्ध असून प्रत्येक दुकानासाठी मासिक भाडे ४ हजार रुपये निश्चित करण्यात आले आहे. हे संकुल डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळ उभारण्यात आले असून शहरातील व्यापाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची व्यावसायिक संधी आहे.निविदा (टेन्डर) भरण्याकरिता १. भन्साळी कॉम्प्युटर्स 9923702345, २. सोमेश्वर एन्टरप्रायजेस 8087830003, ३. रुद्राज एन्टरप्रायजेस 9405464368 याठिकाणी इच्छुक संपर्क साधू शकतात.व्यापाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची व्यावसायिक संधी असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगर परिषद परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या