इमेज
  पोलिसांना आता कडक हेल्मेटसक्ती; विनाहेल्मेट दिसल्यास थेट सेवापुस्तकात होणार नोंद! महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात शिस्त आणि रस्ते सुरक्षा अधिक कडक करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. या नव्या निर्णयानुसार आता दुचाकी चालवणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाईच नाही, तर त्यांच्या सेवापुस्तकातही तशी नकारात्मक नोंद केली जाणार आहे. गेल्या दशकातील अपघातांची आकडेवारी पाहता दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण ३५ ते ४० टक्के असल्याचे समोर आले असून, खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच हेल्मेट वापराचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. ब्लूमबर्ग फिलिंथ्रॉपीज इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार मुंबई आणि नागपूरमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक असले, तरी उर्वरित महाराष्ट्रातील शहरांत ही संख्या २० टक्क्यांच्याही खाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर मानून प्रशासनाने सर्व पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा अधीक्षक...

समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद 




महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती सोहळयास परळीत सुरुवात 

परळी प्रतिनिधी.     प्रसिद्ध खंजिरी वादक व प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पवन महाराज दवंडे यांच्या शिव, फुले ,शाहू, आंबेडकर समाज प्रबोधन कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. परळी शहरातील शिवाजीनगर येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्ताने संयुक्त जयंती सोहळ्यास काल दिनांक 11 एप्रिल पासून सुरुवात झाली.

   क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची 199 जयंती 11 एप्रिल रोजी तर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल रोजी उत्साहात साजरी करण्यात येत आहे .या निमित्ताने शिवाजीनगर परळी येथे संयुक्त जयंती महोत्सव सोहळ्यास सुरुवात झाली. रात्री 8  वाजता लुंबिनी बुद्ध विहार येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन दिव्यांग विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक अजयकुमार गंडले होते .तर प्रमुख पाहुणे  म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व पत्रकार रानबा गायकवाड, नगरसेवक निळकंठ चाटे, नगरसेवक पिंटुभैय्या मुरकुटे, नगरसेवक भीमराव डावरे, पृथ्वी शिंदे, दिनेश गजमल आदी उपस्थित होते.

       यावेळी बोलताना डॉ.संतोष मुंडे म्हणाले की, एप्रिल महिन्यात तीन दिवसांत दोन महापुरुषांचा जन्म झाला आहे.त्यामुळे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे.तर अध्यक्षीय भाषणात अजयकुमार गंडले यांनी महात्मा फुले यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना महात्मा फुले हे त्याकाळी प्रचंड श्रीमंत होते तरी त्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी स्वतःला वाहून घेतले. महात्मा फुले यांनीच रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर एक हजार ओळींचा प्रथम पोवाडा लिहिला.तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा असे आवाहन केले.यावेळी निळकंठ चाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

     यावेळी समाज प्रबोधनकार पवन महाराज दवंडे यांनी खास शैलीत आजच्या भोंदुगिरीवर व देशातील विदारक परिस्थितीवर हल्ला चढवला.तसेच मनोरंजनातून प्रबोधन करतांना उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिनेश गजमल उपाध्यक्ष सचिन कांबळे सचिव हरीश चव्हाण कोषाध्यक्ष मेघराज पारधे, कोषाध्यक्ष गणेश मोदानी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कवी सिद्धेश्वर इंगोले यांनी केले. कार्यक्रमास शिवाजीनगर तसेच परिसरातील महिला, पुरुष, बालक, बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....