दिव्यांग मुलींना किसान विकास पत्राचे वितरण

इमेज
कडक उन्हात ना. पंकजा मुंडे चार दिवस विदर्भ दौऱ्यावर ; शासकीय बैठका, लोकार्पण आदी भरगच्च कार्यक्रम पशूचिकित्सालयाचे केळझर येथे भूमीपूजन तर सेलडोह येथे लोकार्पण पशूपालकांचे नुकसान होणार नाही याची सरकार काळजी घेईल ; जनावरांचे स्थलांतरण थांबविण्यासाठी कायमस्वरूपी छावण्या लावण्यासाठी प्रयत्न पशुपालक व शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत घेतली बैठक वर्धा, दि.१५ -- कडक उन्हामुळे एकीकडे अंगाची लाही लाही होत असताना अशा वातावरणात  राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे मात्र पशूपालकांसाठी सरसावल्या आहेत. आजपासून चार दिवस त्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्या वर्धा इथे होत्या. जिल्ह्यातील काही भागात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी आणि चाऱ्याअभावी काही पशुपालक आपल्या पशुंचे स्थलांतरण करीत असल्याचे येथे आल्यानंतर समजले. हे स्थलांतरण थांबविण्यासाठी पशुपालकांच्या गावाशेजारीच पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात कायमस्वरुपी पाणी आणि चारा उपलब्ध करून देणाऱ्या छावण्या लावण्यासाठी प्रयत्न करू, असे पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सांगितले.    जिल्हाधिकारी कार्यालयात पशुप...

 वैद्यनाथ कॉलेजमध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी  

सत्य,न्याय व बंधुता हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचे प्राण -डॉ माधव रोडे  परळी प्रतिनिधी...... जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये  प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.माधव रोडे यांनी सत्य न्याय व बंधुता हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचे प्राण आहेत हे सांगून महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे महाराष्ट्रातील एक थोर भारतीय समाजसुधारक, विचारवंत, लेखक आणि शिक्षणक्रांतीचे जनक होते. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, जातिभेद निर्मूलन आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला  त्यांनी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली हे सांगून कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’  असे रोखठोकपणे असे विचार यास प्रसंगी व्यक्त केले. 

     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे व्ही जगतकर यांनी महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य केले. त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर असलेल्या दिसून येतात. स्त्रियांना जर शिक्षण मिळाले नसते तर त्यांची परिस्थिती विदारक बनली असती. फुले दाम्पत्यांना या कार्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते,तरी देखील त्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून समाजप्रबोधनाचे कार्य हाती घेतले व ते पूर्णत्वाकडे नेले. आजच्या काळात महिलांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा व विचाराचे अनुकरण करावे असा संदेश याप्रसंगी दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप गायकवाड तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही बी गायकवाड यांनी मांडली या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्या परिषद सदस्य व प्राध्यापक प्रतिनिधी डॉ.पी एल कराड,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ व्ही बी गायकवाड, प्रा डी के आंधळे, प्राध्यापक हरीश मुंडे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर  कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....