पोस्ट्स

व्यापार पेठेच्या मुख्य रस्त्यावरच घटना घडल्याने काही काळ तणाव....

इमेज
आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर खल्लास करून टाकू: धमकी देत एकाला बेदम मारहाण परळी वैजनाथ (प्रतिनिधी) "आमच्याविरुद्ध काम करतोस का ?तुला बघून घेऊ" असे म्हणत एका जणाला पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना परळी शहरातील अरुणोदय मार्केट येथील रस्त्यावर घडली. यापुढे आमच्या मशिदीत नमाज पढण्यासाठी आलास तर खल्लास करून टाकू अशी धमकी देत रस्त्यावरच हा राडा झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी शहरातील अरुणोदय मार्केट समोरील रस्त्यावर रविवार दि.८ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता खाजगी वायरमन सय्यद खद्दुस सय्यद मंजूर वय ३७ वर्षे रा.पेठ मोहल्ला हे एका इलेक्ट्रिकल दुकानातून सामान खरेदी करून जात होते. त्यावेळी संगणमत करून त्याला रस्त्यात अडवून पाच जणांनी धमक्या देत मारहाण केली. "तु लई माजला आहेस", "तुला लई मस्ती आली आहे" तु आमचे विरोधात काम का केलेस असे म्हणुन शिवीगाळ सुरू केली. तसेच लोखंडी रॉड दगड आदींचा वापर करत पाच जणांनी या फिर्यादीला त्याच्या ...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
  अर्थसंकल्पातील प्रमुख मुद्दे - राज्यात आरोग्य संस्थाची बळकटी करण्यासाठी निधी दिला जाणार  राज्यात भाषा कला क्रीडा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचे उद्दिष्ट आहे  नाशिक येथे सिहस्थ कुंभमेळा आयोजन केले जाणार आहे त्यासाठी निधी उपलब्ध करून दिले जाणार आहे सातारा येथील दरे येथे निसर्गोपचार केंद्र स्थापन केले जाईल मधुमेहाचे लवकर निदान करण्यासाठी 4 हजार 500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे महाराष्ट्र डिजिटल तंत्रज्ञान अभियान राबविले जाईल आयुष्यमान योजने 1 हजार 356 वरून 2 हजार 399 पर्यंत आजारात वाढ केली आहे महिमा संस्थेची स्थापना करणार तरुणांना बाहेरगावी जाण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले जाईल 36 नवदिशा केंद्र स्थापना केली जाईल महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल ठरले आहे युनिकॉर्नमध्येही महाराष्ट्र अव्वल महाराष्ट्रात 1 लाख 25 हाजर उद्योजक घडविणे व 50 हजार स्टार्ट अप तयार करण्याचे उद्दिष्ट आहे 25 लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा दिली जातील आणखी 25 लाख बहिणींनी लखपतीदीदी करण्याचे उद्दिष्ट आहे 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येत आहे लाडकी बहीण योजना अशीच सुरू राह...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेचा विस्तार; शेतमजुरांनाही मिळणार आर्थिक संरक्षण मुंबई : राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या ‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान’ योजनेची व्याप्ती वाढवून आता शेतमजुरांनाही या सुरक्षा कवचाखाली आणण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली. आतापर्यंत या योजनेचा लाभ प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मिळत होता. मात्र आता शेतमजूर वर्गालाही अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या प्रसंगी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या कष्टकरी वर्गाला सामाजिक सुरक्षेचा आधार मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या योजनेच्या विस्तारासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांच्या कुटुंबालाही आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतमजूर कुटुंबांना अपघाती प्रसंगी मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक सुरक्षेचे कवच अधिक व्यापक होणा...

LIVE: Maharashtra Budget 2026..

इमेज
  Maharashtra Budget 2026 : CM फडणवीसांची मोठी घोषणा; शेतकऱ्यांना मिळणार दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज (दि.०६) रोजी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर मांडला जाणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, फडणवीसांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांसह नवीन योजनांची घोषणा केली आहे. विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतमजुरांचा देखील समावेश करण्यात येणार असल्याचं सांगितलं. याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान, मत्स्यसंपदा योजना, ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, बळीराजा शेतपाणंद रस्ते या चार नव्या योजनांची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, २०४७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर नेणार आहे. याकरिता २०३५ मध्ये राज्याचा अमृत महोत्सव, यासाठी काही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू केली जाणार. डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या ...

Live: Maharashtra budget.....

इमेज
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेंनी प्रस्तावित केलेली ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ मंजूर; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रस्तावित केलेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजने’ला राज्य सरकारने मंजुरी दिली असून याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली. ग्रामीण भागात पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन तसेच इतर पशुधन आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकरी यांना पशुधन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे पशुपालकांना शेतीप्रमाणे विविध शासकीय सवलती, कर्जसुविधा आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग ...

LIVE: maharashtra Budget....

इमेज
अर्थसंकल्पात ग्रामीण विकासावर भर; पशुधन उद्योग, मत्स्यसंपदा आणि शेतमजुरांसाठी महत्त्वाचे निर्णय मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. ग्रामीण भागातील रोजगार वाढवणे, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाला बळ देणे तसेच शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. राज्यात ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या योजनेमुळे पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पशुधन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. तसेच पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांना शेतीप्रमाणे विविध शासकीय सवलती, कर्जसुविधा आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा सुमारे २५ टक्...

अत्यंत मनमिळावू आणि सामाजिक संवेदनशील व्यक्तिमत्व हरवले....

इमेज
परळीतील भाजप नेते, पत्रकार किरण धोंड यांच्या सुविद्य पत्नी सौ.कीर्ती धोंड यांचे निधन परळी वैजनाथ (प्रतिनिधी):       येथील भारतीय जनता पार्टीचे नेते तथा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शहराध्यक्ष  किरण धोंड यांच्या सुविद्य पत्नी सौ. कीर्ती किरण धोंड (वय ४२) यांचे आज, गुरुवार दि. ५ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या जाण्याने धोंड परिवारासह स्नेही, आप्तेष्ट, मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.       सौ. कीर्ती किरण धोंड यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून परळीत काम केले. विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. अत्यंत मनमिळावू, कुटुंबवत्सल आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून त्या सर्वपरिचित होत्या.सौ. कीर्ती धोंड यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पती, सासू आणि एक मुलगा असा  परिवार आहे. स्वतः च्या आजारपणातही जपले होते सामाजिक भान         सौ. कीर्ती धोंड या केवळ अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत नव्हत्या, तर त्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला होता. २०२३ मध्ये त्यांनी शासकीय कर्कर...
इमेज
  परळी संचारच्या वतीने महिला दिनी होणार परळीतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव-अनंत कुलकर्णी परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- जागतिक महिला दिनानिमित्त परळी शहरात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. परळी संचारचे संपादक अनंत शामराव कुलकर्णी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. परळीच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, वैद्यकिय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या अकरा कर्तृत्ववान महिलांचा सा.परळी संचारच्या वतीने महिला दिनी येत्या रविवारी ८ मार्चला गौरव करण्यात येणार आहे. त्यात नगराध्यक्षा सौ.पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, डॉ.शालीनी बालासाहेब कराड, सौ.शर्मिला अशोक जैन, सौ.वर्षाराणी लक्ष्मणराव हाके, नगरसेविका सौ.अर्चना महेंद्र रोडे, सौ.सुमन लक्ष्मण वाकडे, श्रीमती दुर्गा  वैजनाथ दहातोंडे सौ.गौरी सुनील जोशी, कु.राधिका रामप्रसाद शर्मा, स्नेहा एकनाथ बनसोडे, जनाई महाराज कोकाटे आदी महिलांचा यानिमित्ताने गौरव करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शहरातील नाथ चित्...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!