जागतिक महिला दिनानिमित्त उत्साहात उपक्रम..

इमेज
  तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये साजरा स्वतःचा उत्कर्ष कसा करावा याचा संवाद साधणारा कार्यक्रम, पाककलेच्या कौशल्येला वाव देणारा आनंद नगरीचा कार्यक्रम आणि महिलांच्या आरोग्याला थोडासा हातभार लावणारा फ्री डेंटल चेकअप कॅम्प असा तिहेरी आनंदाचा महिला दिन स्कॉलर केजी स्कूलमध्ये उत्साहात साजरा झाला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ सुरेखा बांगर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ रुपाली फड आणि प्रा वंदना जगतकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ पद्धतीने व्यासपीठावर बसण्याची संधी सौ पूनम भुतडा यांना मिळाली. विद्येची देवता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या शिक्षिका आणि फुटके परिवाराच्या वतीने करण्यात आले.  शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी आपल्या प्रास्ताविकात यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या आनंद नगरी, फ्री डेंटल चेकअप कॅम्पचे आयोजन महिला दिनानिमित्ताने करताना आनंद होत असल्याचे सांगितले. डॉ सौ रूपाली फड यांनी महिलांनी कुटुंब सांभाळत असताना स्वतःच्या आरोग्याची क...

LIVE: maharashtra Budget....

अर्थसंकल्पात ग्रामीण विकासावर भर; पशुधन उद्योग, मत्स्यसंपदा आणि शेतमजुरांसाठी महत्त्वाचे निर्णय



मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. ग्रामीण भागातील रोजगार वाढवणे, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायाला बळ देणे तसेच शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.

राज्यात ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना’ सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या योजनेमुळे पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन यांसारख्या व्यवसायांना चालना मिळून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पशुधन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.

तसेच पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसायाला कृषीसमकक्ष दर्जा देण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांना शेतीप्रमाणे विविध शासकीय सवलती, कर्जसुविधा आणि पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्याच्या कृषी उत्पन्नात पशुपालनाचा सुमारे २५ टक्के वाटा असल्याने या क्षेत्राच्या विकासाला चालना देणे आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.

दरम्यान, ‘गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना’ अधिक व्यापक करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांच्या कुटुंबांनाही अपघाती प्रसंगी आर्थिक मदत मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण कष्टकरी वर्गाला सामाजिक सुरक्षेचे कवच मिळणार आहे.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला गोपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठी विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम राबविण्याची घोषणा करण्यात आली. तसेच मच्छीमारांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना’ अंतर्गत दरवर्षी सुमारे १२४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

यासोबतच पुढील दोन वर्षांत राज्यातील ५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यासाठी ‘महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान’ राबविण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.

सरकारच्या या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि नैसर्गिक शेतीला नवे बळ मिळेल तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!