MB NEWS- आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष वृत्तकथा:नौली, वामनौली, दक्षिण नौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे
नौली, वामनौली, दक्षिण नौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी': अॅड. श्रीनिवास मुंडे
परळी वैजनाथ:....
योगशास्त्र ही भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. योगशास्त्रातील क्रिया या सोप्या नसतात.मात्र योग्य मार्गदर्शन व नित्य सरावाने योगशास्त्रातही व्यक्ती पारंगत होऊ शकतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे परळी तालुक्यातील पांगरी (गोपीनाथगड) चे उपसरपंच असलेले अॅड.श्रीनिवास मुंडे हे आहेत.गेल्या अनेक वर्षापासून व्यायाम,योग प्राणायाम यामध्ये नित्य सरावाने पारंगत झालेले अॅड.श्रीनिवास मुंडे योगाच्या आवघडात आवघड क्रियाही अगदी सहजतेने करतात.नौली, वामनौली, दक्षिणनौली या आवघड योगक्रिया लिलया करणारा परळीतील 'सहजयोगी' म्हणून परिचित होत आहेत.
वजनात घट, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगाची मर्यादा ही फक्त योगासनांपूर्तीच मर्यादित आहे असा बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो कारण त्याचे शारीरिक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात. परंतु प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छ्वास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने जीवनाचा प्रवास शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. असे महत्व असल्याने सध्या योगाकडे मोठ्या प्रमाणावर ओढा वाढलेला दिसून येतो.
हे देखील आवश्य वाचा:परळीतील विद्यार्थ्याची संघर्षमय यशोगाथा: दुर्धर आजाराशी झुंज देत 'त्याने' मिळवले 'विशाल' यश !
योग शिबीर असो की योगासंबंधी कार्यक्रम असो त्याठिकाणी अॅड.श्रीनिवास मुंडे यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले जात आहे.एक उत्कृष्ट योगकर्मी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.योग प्रशिक्षण व प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन घेतले जात आहे.योगाचे सखोल परिणाम आपल्या सूक्ष्म स्तरावर सुद्धा होत असतात. योगाच्या नियमित सरावामुळे होणारे महत्वाचे फायदे शरीर सुदृढता निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रचार व प्रसारासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत.
"सर्व स्तरांवर तंदुरुस्ती ,वजनात घट,ताण तणावा पासून मुक्ती,अंर्तयामी शांतता,रोगप्रतिकारक शक्तीत वाढ,
सजगतेत वाढ होते,नाते संबंधात सुधारणा,उर्जा शक्ती वाढते,शरीराचा लवचिकपणा आणि शरीराची ठेवण सुधारतेअंतर्ज्ञानात वाढ होते असे असंख्य फायदे योगामुळे होतात.हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा जपणे, अधिकाधिक अंगिकारणे, प्रचार व प्रसार होणे यासाठी कार्यरत राहणार आहे."
- अॅड.श्रीनिवास मुंडे.
--------------------------------------------
हे देखील आवश्य वाचा:पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला ;वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा