पोस्ट्स

जून ७, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
इमेज
  शेतातील पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने बैल ठार तर शेतकरी, बैल जखमी  दिंद्रुड : धारूर तालुक्यातील तेलगाव शिवारातील शेतकरी जयप्रकाश उत्तमलाल तोष्णीवाल यांच्या पांढरी नामक शेतात सालगडी बैलजोडीने पाळी घालत असताना पोलच्या ताणात विद्युत प्रवाह उतरल्याने ताणाला चिटकून एक बैल जागीच ठार झाला तर शेतमजूर व एका बैलाचा प्राण वाचला असून दोघेही किरकोळ जखमी आहेत. तोष्णीवाल यांच्या शेतात असलेल्या विद्युत पोलला ताण दिलेल्या तारेला अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने बैलाला करंट लागून बैल ठार झाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरा बैल व सालगडी दिपक थोरात किरकोळ जखमी झाले आहेत. शेतकऱ्याला आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
इमेज
Beed news | रेंगाळलेल्या रस्ता कामाची धूळ शेतात, पिकांची वाढच खुटंली, शेतकऱ्याने संतापून मिरची - पपईची झाडे उपटून टाकली! दिंद्रुड : बीड–परळी महामार्गावरील सुरू असलेल्या रस्ते कामामुळे उडणाऱ्या धुळीचा फटका रस्त्यालगतच्या शेतीला बसत असून, धारूर तालुक्यातील भोपा येथील एका शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्याने सोमवारी स्वतःच्या शेतातील पपई व मिरचीची उभी पिके अक्षरशः उपटून टाकली. बीड–परळी महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षांपासून सुरू आहे. या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, तिचा परिणाम रस्त्याशेजारील पिकांवर होत आहे. भोपा येथील शेतकरी रवी वाघचौरे यांनी सव्वा एकर क्षेत्रात मार्च महिन्यात पपई व मिरचीची लागवड केली होती. मात्र, रस्त्यावरील धूळ सतत पिकांवर साचत गेल्याने पिकांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. पिकांवर अनेक वेळा औषध फवारणी करूनही अपेक्षित परिणाम झाला नाही. धूळ पानांवर साचल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. परिणामी पिकांची वाढ खुंटली आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता कमी झाली. अखेर उत्पादनाची आशा संपुष्टात आल्याने श...
इमेज
  सेलु आणि लोणी गावच्या नागरिकांची रोडसाठी थेट मंत्रालयात धाव परळी वै., प्रतिनिधी ...- सेलु व लोणी गावच्या नागरिकांना रोडसाठी मंत्रालयात धाव घ्यावी लागली. अनेक दिवसांपासुन परळी-सेलु-बोंदरगाव व परळी-लोणी-दत्तवाडी हे दोन्ही ही रोड खड्डामय झाल्याने नागरिकांना खुपच त्रास होत आहे. मा. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील तरतूदीनुसार 1000 लोकसंख्या असलेली गावे सिमेंट रोडनी जोडून नागरिकांचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे  दिनांक 04/02/2026 पासुन ग्राम पंचायत लोणी, ग्राम पंचायत सेलु व ओबीसी परिषद या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मा. मुख्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्री, रोजगार हमी मंत्री, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद बीड इत्यादींना निवेदने दिली. अद्यापपावेतो रोड न झाल्याने थेट मंत्रालयात जावून दिनांक 05/06/2026 रोजी रोडची निवेदनाद्वारे व्यथा व्यथित करण्यात आली. संबंधीत खात्याने तुमचे काम प्राधान्याने करू असे आश्वासन दिले.  तेव्हा लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे नागरिकांचा जिव्हाळ्याचा व जीवनमरणाचा प्रश्न आहे परळी-सेलु...
इमेज
  विविध मागण्या संदर्भात ग्रामरोजगार सेवक बनसोडे यांचे चार दिवसापासून पंचायत समिती समोर उपोषण सुरू  कारवाई न झाल्यास  पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा  परळी प्रतिनिधी      तालुक्यातील दौनापूर ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवक कृष्णा बनसोडे यांचे परळी पंचायत समिती समोर गेल्या 5  दिवसांपासून विविध मागण्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे .दरम्यान उपोषणकर्त्याला न्याय मिळाल्यास उद्या दिनांक 9  जून रोजी परळी पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.      याबाबत अधिक माहिती अशी की परळी तालुक्यातील दौनापूर येथील ग्रामपंचायत मध्ये ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत असलेले प्रश्न बनसोडे दिनांक 4 जून पासून परळी पंचायत समिती समोर उपोषणास बसले आहेत गेल्या एक वर्षापासून त्यांचा आयडी सरपंच ग्रामसेवक व तलाठी यांनी बंद केला आहे तो तात्काळ चालू करावा तसेच दौनापूर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक आणि परळी पंचायत समितीचे बांधकाम इंजिनिअर यांनी संगणमताने गावात कामे न करताच ...

दुःखद वार्ता....

इमेज
  व्यंकटराव निर्मळ पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन सिरसाळा : हिवरा गोवर्धन येथील प्रतिष्ठित नागरिक तथा प्रगतिशील शेतकरी कै. व्यंकटराव अच्युतराव निर्मळ पाटील यांचे सोमवार दिनांक 8 जून रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथील येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे आणि सर्वांना अडीअडचणीत सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे व्यकटराव निर्मळ हे हिवरा गोवर्धन आणि पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.सोमवारी सायंकाळी 5 वाजता व्यंकटराव निर्मळ पाटील यांच्या पार्थिवावर हिवरा गोवर्धन येथील स्मशानभूमीत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी हिवरा गोवर्धन व परिसरातील सर्व स्तरातील प्रतिष्ठित आणि नामांकित मंडळी उपस्थित होती. माजी जिल्हा परिषद सदस्य वृक्षराज निर्मळ पाटील यांचे ते वडील होत तर भाजपचे परळी तालुका मंडळ अध्यक्ष वसंतराव निर्मळ पाटील यांचे ते चुलते होत. एमबी न्यूज परिवार निर्मळ पाटील परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.
इमेज
सरस्वती नदी अतिक्रमणमुक्त करा; मांसविक्री बंद निर्णयाची अंमलबजावणी करा- वैद्यनाथ भक्ती मंडळाचे साखळी उपोषण सुरू   परळी (प्रतिनिधी)  परळी नगर पालिकेच्या वतीने सरस्वती नदीवरील अतिक्रमण न हटविता काम सुरु असुन सरस्वती नदी अतिक्रमणमुक्त करावी,शहरात सोमवारी मांसविक्री बंद निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने नगरपालिकेसमोर सोमवार दि.८ जुन पासुन साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक क्षेत्र असल्याने परळी शहरात देशभरातुन भाविक येत असतात.प्रभु वैद्यनाथाच्या धार्मिक इतिहासात शहरातुन वाहणार्या सरस्वती नदीला मोठे महत्व आहे.या नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यात आलेली नाहीत.नदीपात्रातील अतिक्रमणे काढुन पात्र मोकळे करावे,सोमवार हा प्रभू श्री वैद्यनाथांचा अत्यंत पवित्र दिवस मानला जात असल्याने धार्मिक भावना, परंपरा आणि भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखण्यासाठी नगर परिषदेने दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असुन या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी वैद्यनाथ भक्ती मंडळाच्या वतीने दीपक जोशी,कुणाल चाटे,ओमकार मिरकले,अभि...
इमेज
खोडवा सावरगाव येथील पाणंद रस्त्याचे निकृष्ट काम;सखोल चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी : तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्याच्या कामात झालेल्या कथित अनियमिततेबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती परळी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खोडवा सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा पाणंद रस्ता दत्तात्रय मानाजी दहिफळे यांच्या शेतापर्यंत करण्यात आला आहे. या रस्त्याचे काही ठिकाणी १० फूट तर काही ठिकाणी २० फूट रुंदीचे काम करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात रस्त्यावर मोठे दगड व खडी टाकण्यात आली असून मुरुमाचा वापर अत्यल्प प्रमाणात करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. रस्त्याच्या कामात अंदाजपत्रकानुसार (इस्टिमेटप्रमाणे) काम झाले नसून संबंधित कामाची तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी  करण्यात आली आहे. तसेच रस्त्यालगत आवश्यक ठिकाणी नाली बांधण्यात आलेली नसल्यामुळे पावसा...

मागण्या मान्य न झाल्यास लवकरच रेल्वे रोको आंदोलन

इमेज
रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी परळी रेल्वे स्थानकावरील धरणे आंदोलनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मागण्या मान्य न झाल्यास लवकरच रेल्वे रोको आंदोलन परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-         परळी वैजनाथ रेल्वे विकासाच्या प्रश्नांकडे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ व रेल्वे स्थानकाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वे स्थानक परिसरात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला नागरिक,व्यापारी, महिला आणि रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या सर्व न्याय मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.         याबाबत अधिक माहिती अशी की, मराठवाड्यातील रेल्वे विकासाच्या प्रश्नांकडे दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आणि परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दि. ८ जून रोजी परळी रेल्वे स्थानक परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.परळी रेल्वे विकास समिती, मराठवाडा जनता विकास परिषद आणि विविध साम...
इमेज
अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या  धारूर, प्रतिनिधी  धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथे एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .  स्वाती मारुती देठे (वय १३, रा. आंबेवडगाव) असे मृत मुलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास स्वाती हिने घरातील पत्र्याच्या लोखंडी अडूला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने धाव घेतली; मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मुलीचे वडील यांचे मागील दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते . दरम्यान, एवढ्या लहान वयात स्वातीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे
इमेज
तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून सांत्वनपर भेट परळी | प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते जीवनराव देशमुख, नगरपरिषद गटनेते नितीन बागवाले, नगरसेवक कादर कुरेशी, श्रीनिवास राऊत, बाबा शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तोहीद पठाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या. तसेच या दुःखद प्रसंगात कुटुंबीयांनी खंबीर राहावे, अशी भावना व्यक्त करत पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. या सांत्वनपर भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनीही उपस्थित राहून तोहीद पठाण यांना श्रद्धांजली अर्पण केली. या भेटीमुळे कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्...

पोलिसांनी बनावाचे धागे उलघडले ,तिसरी आरोपी पत्नी

इमेज
अंजनवती अपघात प्रकरण : खुनाच्या कटात मयताची पत्नी सहभागी नेकनुर पोलिसांनी बनावाचे धागे उलघडले ,तिसरी आरोपी पत्नी  नेकनुर, प्रतिनिधी... नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अंजनवती येथील कामगार युवक अपघाताचा बनाव असलेल्या खुन प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू असल्याचा संशय असलेल्या या प्रकरणात सखोल तपासादरम्यान हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले दोन आरोपींना नेकनूर पोलिसांनी तळोजा पनवेल येथून ताब्यात घेतले यानंतर मात्र यातील काही धागे उलगडण्यात एपीआय मंगेश साळवे यांना यश आले असून आरोपी प्रियकराच्या मदतीने मयताच्या पत्नीचा खून करण्यात हात असल्याचे समोर आले आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अंजनवती येथील कामगार युवक किरण बंडू सोनवणे याचा लिंबागणेश अंजनवती रस्त्यावर असलेल्या नाल्यात मृतदेह आढळून आला सुरुवातीला अपघाताचा बनाव दाखवण्यात आला मात्र गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने नेकनुर पोलिसांनी तपासाला गती देत तीन दिवसातच तळोजा ,पनवेल येथून या प्रकरणातील आरोपी दशरथ प...

खळबळजनक घटना......

इमेज
अनोळखी व्यक्तीचे विहिरीत सापडले प्रेत    दिंद्रुड :  तेलगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत सापडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान सदरील प्रेताचे ओळख अद्याप ही पटली नसल्याने प्रेत अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात शवागारात ठेवण्यात आले आहे.सदरील प्रेता बाबत कुणाला ओळख पटली तर दिंद्रुड पोलीसांशी संपर्क साधावा.असे आवाहन पोलीसांनी केले आहे.               यासंदर्भात पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की,तेलगाव ता.धारूर येथील एका शेतकऱ्याच्या शेतात सोमवारी सकाळी एका अज्ञात पुरूषाचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत विहिरीतील पाण्यात तरंगताना शेतकऱ्यास दिसुन आले.त्यावर संबंधित शेतकऱ्याने दिंद्रुड पोलीसांना याची माहिती दिली.त्यावर दिंद्रुड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलीसांनी परिसराची पाहणी करून विहिरीतील प्रेत पाहिले असता ते पालथे असल्याचे दिसून आले.स्थानिक शेतकरी व नागरिक यांच्या सहकार्याने पोलीसांनी प्रेत विहिरी बाहेर काढले.सदरील प्रेत हे गेल्या चार पाच दिवसांपासून विहिरीत असल्याचा अंदाज आहे.मयताच्या अंगावर पिवळ्या रंगाचे का...
इमेज
युवराज भास्करराव मुंडे यांना पीएचडी प्रदान परळी वैजनाथ (प्रतिनिधी)         युवराज भास्कर मुंडे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून  " वारकरी संप्रदायात वंजारी समाजातील संतांचे  योगदान : एक ऐतिहासिक अभ्यास " हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी चे प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले हे त्यांचे मार्गदर्शक होते. इतिहास विषयात प्राध्यापक पदासाठीची राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाले आहेत.      मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य  कन्हेरवाडी चे भुमिपुत्र डॉ.भास्कर  सोपानराव मुंडे यांचे युवराज हे सुपुत्र आहेत. या यशाबद्दल पुणे इन्कमटॅक्स आयुक्त  विश्वास सोपानराव मुंडे  (IRS), पुणे समाज कल्याण आयुक्त  सौ.दीपाताई  विश्वासराव मुंडे IAS, न्यायाधीश आनंद सोपानराव मुंडे ,डॉ. कल्याण सोपानराव मुंडे , नारायण फड आदींनी या यशाबद्दल  अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ...
इमेज
  परळीत कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा-महादेव गंगणे पाटील गुन्हेगारांच्या दहशतीखाली शहर, पोलीस प्रशासन नेमके करतेय तरी काय?;खून, मारामाऱ्या, टोळक्यांचा उच्छाद, नागरिकांमध्ये भीतीचे सावट परळी | प्रतिनिधी एकेकाळी शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या परळी शहराची ओळख आता दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होत चालली आहे. शहरात गेल्या काही महिन्यांपासून खून, जीवघेणे हल्ले, टोळीयुद्ध, सार्वजनिक ठिकाणी मारामाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या घटना आणि कायद्याला खुलेआम आव्हान देणारे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे परळीतील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळी शहरात कायदा संस्थेचे तीन तेरा झाले असून पोलीस प्रशासनाचा कसलेही प्रकारचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. या बाबत आपण लवकरच बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी शहराध्यक्ष महादेव गंगणे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.    ...
इमेज
  परळी गंगाखेड रोडवरील  पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे --मनसे   परळी- गंगाखेड रोड वरील शक्तीकुंज वसाहत जवळील पुलाचे काम रखडल्यामूळे नागरीकांसाठी तो मृत्युचा सापळा बनला आहे. आज मनसे कडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन पाठवण्यात आले. पुलाचे काम रखडल्यामुळे अनेक नागरीक या ठिकाणी पडत आहेत. येत्या आठ दिवसात पुलाचे काम चालू नाही झाल्यास मनसे कडून तीव्र आंदोलन करण्या येईल असा इशारा मनसे कडून देण्यात आला.या प्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष दत्ता दहिवाळ,तालुकाधयक्ष श्रीकांत पाथरकर,तालुकाउपाध्य ऋषिकेश बारगजे, विठ्लदादा झिल्मेवाड, प्रशांत कामाळे, लक्ष्मण शिंदे,आत्माराम खंदारकर,सचीन आघाव, महेश शेप आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
इमेज
  राक्षसभूवन वाळू घोटाळ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून ड्रोनद्वारे चौकशी; ४० जणांचे विशेष पथक नियुक्त गेवराई, प्रतिनिधी...  गेवराई तालुक्यातील राक्षसभूवन परिसरात घरकूल लाभार्थ्यांच्या नावावर हजारो ब्रास वाळूचा अवैध उपसा करून त्याची खुलेआम विक्री झाल्याच्या गंभीर आरोपांनंतर जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकारी स्तरावर तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला असून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. राक्षसभूवन येथील गोदापात्राची जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोनच्या साहाय्याने पाहणी सुरू केली असून अवैध उत्खननाचे क्षेत्र, तयार करण्यात आलेले अनधिकृत रस्ते तसेच वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले मार्ग यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. ड्रोनद्वारे मिळालेल्या छायाचित्रे व व्हिडिओच्या आधारे सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार असून त्यामुळे अवैध उपशाचे ठोस पुरावे प्रशासनाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरकूल योजनेअंतर्गत ज्यांच्या नावावर वाळू उचलल्याची नोंद आहे, अशा सर्व लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासा...
इमेज
  गुंगीचे औषध देऊन  कॉलेज तरुणीवर अत्याचार; तीन लाखांसह साडेनऊ तोळे सोने उकळले, दोन तरुण जेरबंद अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ कुटुंबाला दाखवण्याची धमकी देत पीडितेकडून तीन लाख रुपयांची रोकड आणि साडेनऊ तोळे सोने लुटले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडित तरुणी अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी राहत असताना तिची ओळख महेश करपे (रा. धारूर) आणि पवन कराड (रा. पांगरी, ता. परळी) या दोन तरुणांशी झाली. हे दोघे तिचा सतत पाठलाग करत असत. एके दिवशी महेश याने तरुणीला जबरदस्तीने मंचुरियन खाऊ घातले, ज्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पवन कराड यानेही तिला गुंगीचे औषध देऊन पुणे येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दोन्ही आरोपींनी या कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व नातेवाईकांना दाखवण्याच...

खान कुटुंबीयांना न्याय मिळेल - धनंजय मुंडे

इमेज
तौहीद खान कुटुंबीयांची धनंजय मुंडेंनी घेतली भेट, तिन्ही अपत्यांच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी खान कुटुंबीयांना न्याय मिळेल - धनंजय मुंडे परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - काही दिवसांपूर्वीच परळीजवळ झालेल्या एका दुर्दैवी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या मयत तौहीद खान याच्या कुटुंबाची रविवारी सायंकाळी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. यावेळी मयत तौहीद यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत मुंडेंनी तोहीदला श्रद्धांजली वाहिली. तसेच तौहीद याच्या दोन मुली व एक मुलगा अशा तीनही अपत्याच्या शिक्षणाची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी स्वीकारली असल्याचे कुटुंबियांना स्पष्ट केले.  दरम्यान मयत तौहीद खान याच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यादृष्टीने जलद गतीने व सर्व बाजूने तपास करून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यात यावी, याबाबत पोलिस प्रशासनास श्री. मुंडे यांनी सूचना केल्या.  मयत तौहीद खान हा घरातील एक कर्ता तरुण गमावल्याने कुटुंबाची अडचण लक्षात घेत धनंजय मुंडे यांनी खान कुटुंबीयांना नाथ प्रतिष्ठान मार्फत एक लाख रुपयांची तात्पुरती आर्थिक मदत रोख स्वरूपात केली आहे.  खान कु...

ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा ही परळीची संस्कृती !

इमेज
मयत तोहीद खान कुटुंबीयांची नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई  धर्माधिकारी यानी भेट घेऊन केलं सांत्वन ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा ही परळीची संस्कृती ! दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही सर्वांचीच भूमिका - नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधकारी परळी वैजनाथ,  प्रतिनिधी :        परळी वैजनाथ शहरातील तरुण तोहीद खान यांच्या दुर्दैवी हत्येच्या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी रविवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी आपण कुटुंबासोबत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तोहीद खान यांची  हत्या ही केवळ एका कुटुंबावर झालेला आघात नसून संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी घटना आहे. अशा अमानुष व क्रूर कृत्याचा त्यांनी तीव्र निषेध करत आरोपींना तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा ही आपल्या परळीची संस्कृती असुन ती जपत अशा प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच सर्वांची भूमिका आहे असे नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या