MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी




परळी वैजनाथ दि.03 (प्रतिनिधी)

               शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे,प्रा. डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच आज सर्वत्र मुलींना शिक्षण घेता येत असून स्वर्गीय शामराव देशमुख हे फुलेंच्या विचाराचे खरे पाईक आहेत. यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे पवित्र कार्य पुढे घेऊन जात आहेत. अलिकडच्या काळात समाजाच्या जाणीवा बोथट होत चालल्या आहेत, फुले दांपत्याच्या विचाराचे जागरण झाले पाहिजे.असे प्रतिपादन यावेळी डॉ जगतकर यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करताना संजय देशमुख यांनी सांगितले की, फुले दांपत्याचा विचाराचा, शिक्षणाचा वारसा पुढे जपला पाहिजे, आमचा तो पर्यंत आहे. प्रास्ताविक प्रा फुटके यांनी तर सुत्रसंचालन नंदिनी जाधव व आरती डाके, आभार निकीता पवार या विद्यार्थ्यांनी मानले, यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रविण दिग्रसकर, प्रा.प्रविण नव्हाडे, प्रा.विशाल पौळ यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार