दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

 लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी




परळी वैजनाथ दि.03 (प्रतिनिधी)

               शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

              लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष संजय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ लक्ष्मण मुंडे,प्रा. डॉ विनोद जगतकर यांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.डॉ विनोद जगतकर यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच आज सर्वत्र मुलींना शिक्षण घेता येत असून स्वर्गीय शामराव देशमुख हे फुलेंच्या विचाराचे खरे पाईक आहेत. यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणाचे पवित्र कार्य पुढे घेऊन जात आहेत. अलिकडच्या काळात समाजाच्या जाणीवा बोथट होत चालल्या आहेत, फुले दांपत्याच्या विचाराचे जागरण झाले पाहिजे.असे प्रतिपादन यावेळी डॉ जगतकर यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करताना संजय देशमुख यांनी सांगितले की, फुले दांपत्याचा विचाराचा, शिक्षणाचा वारसा पुढे जपला पाहिजे, आमचा तो पर्यंत आहे. प्रास्ताविक प्रा फुटके यांनी तर सुत्रसंचालन नंदिनी जाधव व आरती डाके, आभार निकीता पवार या विद्यार्थ्यांनी मानले, यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रविण दिग्रसकर, प्रा.प्रविण नव्हाडे, प्रा.विशाल पौळ यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....