पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली :

इमेज
  सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित! पनवेल-नांदेड शिवाजीनगरलाच तीन तासांपासून अडकली  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) कडून सोलापूरला निघालेल्या २२२२५ वंदे भारत एक्स्प्रेसला पुणे रेल्वे स्थानकात अपघात घडला. रेल्वेच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली रुळावरून घसरली. रेल्वेने पुणे रेल्वे स्थानकात प्रवेश करताच ही ट्रॉली स्थानकाच्या डायमंड क्रॉसिंगवर रुळावरून घसरली. संयंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  डायमंड क्रॉसिंग लगेचच बदलण्याचे निर्देश - महत्वाचे म्हणजे, या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समजते. पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत क्रॉसिंग अपग्रेड करण्याचे काम नियोजित आहे. त्याच दरम्यान हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनचे केवळ एक चाकच डायमंड क्रॉसिंगवर घसरले आहे. ती डायमंड क्रॉसिंग लगेचच बदलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. खरेतर, देशभरातील अशा सर्व नॉन स्टॅन्डर्ड डायमंड क्रॉसिंग बदलण्यात येत आहेत. दु...

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ - डॉ. भरत मुंडे




टोकवाडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया असे आवाहन डॉ. भरत मुंडे यांनी केले.

       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टोकवाडी येथे मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.यावेळी गावात मिरवणुक दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत  पाण्याच्या बॉटल चे वाटप करण्यात आले.

       यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणात डॉ. भरत मुंडे यांनी कविता सादर करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी यावेळी सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण जगासाठी ज्ञानाचे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्याला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मंत्र दिला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. आजच्या धावपळीच्या युगात शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे, ज्याच्या जोरावर आपण प्रगती करू शकतो. बाबासाहेबांचे विचार नुसते भिंतीवर लावू नका, तर ते आपल्या हृदयात आणि कृतीत आणा. एकमेकांना मदत करा, सामाजिक सलोखा राखा असे आवाहन डॉ. भरत मुंडे यांनी केले

     या कार्यक्रमास टोकवाडी चे पंचायत समिती  माजी सभापती बालाजी उर्फ पिंटू मुंडे, टोकवाडीच्या सरपंच गोदावरी ताई राजाराम मुंडे डॉ. राजाराम मुंडे माजी सरपंच मारोतराव मुंडे गुरुजी, नाथराव दादा मुंडे, संभाजी मुंडे (योग प्रशिक्षक),विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत मुंडे , नवनाथ मुंडे,भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय मुंडे , युवा नेते तुकाराम टी.डी.मुंडे, उद्योजक संतोष मुंडे , टोकवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच बंडूभाऊ काळे डॉ. संदीपान काळे, सोपान तात्या मुंडे, श्रीराम मुंडे, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तुकाराम भक्तराम मुंडे, युवा उद्योजक अर्जुन मुंडे,ज्येष्ठ नेते महादेव आण्णा मुंडे , श्रीनिवास मुंडे,प्रदीप घुले, माउली फड, राजाभाऊ गित्ते,गणेश नागरगोजे,दिलीप भालेराव, भरत रोडे , पंडितराव रोडे,अमर रोडे , साहेबराव रोडे, माजी उपसरपंच सुरेश रोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....