इमेज
  संघर्षातून यशाकडे: भांडी-धुणी करणाऱ्या माऊलीच्या लेकीची १२ वीच्या परीक्षेत मोठी झेप! परळी वैजनाथ,प्रतिनिधी... आईने दुसऱ्यांच्या घरी भांडी-धुणी करून काबाडकष्ट केले आणि मुलीनेही त्या कष्टाचे चीज करत १२ वीच्या परीक्षेत तब्बल ७८% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. परिस्थिती बेताची असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिळवलेल्या तनुजा रणदिवे या मुलीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तनुजा ची आई पद्मिन तानाजी रणदिवे  गेल्या अनेक वर्षांपासून गणेशपार भागात धुणी-भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. पतीच्या निधनानंतर व आर्थिक स्थिती हलाखीची असताना घराची संपूर्ण जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. "माझ्या वाट्याला आलेले कष्ट माझ्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत," याच एका ध्येयाने या माऊलीने दिवसरात्र काम केले. परळी येथे हनुमान नगर येथे किरायाच्या घरात राहणाऱ्या व घरात अभ्यासासाठी वेगळी खोली नाही की महागडे क्लास लावण्याची सोय नव्हती. आई कामावर गेल्यावर घरची कामे आटपून ही मुलगी अभ्यासाला बसायची. रात्री उशिरा पर्यंत तिने चिकाटीने अभ्यास केला. कष्टाचे मोल जाणणाऱ्या तनुजाने अभ्यासात कधीही ...

भूसंपादन प्रकरणी नागरिकाची तक्रार ; प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत:न्याय देण्याची मागणी


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – भूसंपादन प्रकरणात न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ एका नागरिकाने आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. संबंधित प्रकरणाची दखल घेत पुढील कार्यवाही सुरू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतरही न्याय मिळत नसल्याची खंत या नागरिकाने व्यक्त केली आहे.
         उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, परळी वैजनाथ (भूसंपादन विभाग) कार्यालयाकडून दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी संबंधित अर्जदारास पत्र देण्यात आले आहे. या पत्रानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ, औरंगाबाद येथील आदेश क्रमांक 1956/2024 संदर्भात अर्जदाराने न्याय मिळावा व जमिनीच्या बदल्यात योग्य मोबदला मिळावा, यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, अपेक्षित तोडगा न निघाल्याने अर्जदाराने आंदोलनाचा मार्ग अवलंबत 1 मे 2026 रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित प्रकरण भूसंपादन अधिनियम 1894 च्या कलम 28-अ अंतर्गत आहे. अर्जदाराचा दावा यापूर्वीच कार्यालयात सादर करण्यात आला असून, त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणी उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली असून न्यायालयाने संबंधित बाबींची तपासणी करून निर्देश दिले आहेत.
          दरम्यान, जिल्हाधिकारी बीड यांच्या स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. अर्जदाराला   प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर आत्मदहनासारख्या टोकाच्या भूमिकेऐवजी कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने प्रशासनाकडून त्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे असे लेखी आश्वासन दिल्यानंतरही आपली परवड सुरुच असुन प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची खंत तक्रारदार केशव नारायण डाके रा.गोपनपाळे गल्ली यांनी व्यक्त केली असुन आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....