३ जून..... गोपीनाथ गडावर साधेपणाने कार्यक्रम...
परळीत अतिक्रमण न हटवल्यास नगर परिषदेसमोर साखळी उपोषण; प्रशासनाला निवेदन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी):शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन ते बसवेश्वर कॉलनी रस्ता आणि गायकवाड यांचे घर ते महात्मा बसवेश्वर चौक या भागातील रस्ते व नाल्यांच्या कडेला झालेले अवैध अतिक्रमण प्रशासनाने तत्काळ हटवावे, अन्यथा नगर परिषदेसमोर गांधीगिरी पद्धतीने साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी यांनी दिला आहे. या संदर्भातील मागण्यांचे एक रीतसर निवेदन आज नगर परिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.शहरातील या प्रमुख रस्ते आणि मुख्य नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन ते बसवेश्वर कॉलनी दरम्यानच्या नाली व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी परिसरात अस्वच्छता पसरली आहे.तसेच गायकवाड यांचे घर ते महात्मा बसवेश्वर चौक या अत्यंत वर्दळीच्या परिसरातील नाला व रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांमुळे अपघातांचा धोका कमालीचा वाढला आहे.प्रशासनाला शेवटचा इशाराया गंभीर नागरी समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दीपक जोशी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नगर परिषद कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व मागण्यांचे निवेदन दिले. जनतेच्या आरोग्यासाठी आणि सुविधेसाठी हे अतिक्रमण त्वरित काढणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने यावर तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, तर लोकशाही व गांधीगिरीच्या मार्गाने नगर परिषदेसमोर तीव्र साखळी उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा याप्रसंगी दीपक जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी परिसरातील नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा