३ जून..... गोपीनाथ गडावर साधेपणाने कार्यक्रम...
शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ!
विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा
मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ला अधिकृत मंजुरी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाईल.
या महत्त्वपूर्ण निर्णयाचा राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. मात्र, यामुळे सरकारी तिजोरीवर तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. लाडकी बहीण योजना आणि आता ही कर्जमाफी यामुळे आगामी काळात सरकारला मोठी आर्थिक काटकसर करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या कर्जमाफीची अधिकृत घोषणा सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा