३ जून..... गोपीनाथ गडावर साधेपणाने कार्यक्रम...

इमेज
लोकनेते मुंडे साहेबांचा उद्या स्मृतीदिन ; भजन, प्रसाद, सामाजिक उपक्रमांच आयोजन ना. पंकजा मुंडे, डाॅ. प्रितम मुंडे गोपीनाथ गडावर होणार नतमस्तक परळी वैजनाथ दि. ०२ -- लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा उद्या स्मृतीदिन असून गोपीनाथ गडावर त्यानिमित्त भजन, प्रसाद आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे, डॉ.प्रीतमताई मुंडे  हया परिवारासह उद्या याठिकाणी उपस्थित राहणार आहेत.     सध्याची परिस्थिती आणि देशावर आलेले संकट पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून यंदा मुंडे साहेबांची पुण्यतिथी आपापल्या गावात व घरीच करण्याचे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले आहे,  त्यामुळे गोपीनाथ गडावर यंदा भव्य दिव्य कार्यक्रम नसला तरी यादिवशी भजन, प्रसाद व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.   ना. पंकजाताई मुंडे, माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे उद्या सकाळी १० वा. गोपीनाथ गडावर पोहोचणार आहेत. याठिकाणी त्या मुंडे साहेबांना आवडणा-या पदार्थाचा नेवैद्य समाधीसमोर अर्पण करणार आहोत. यावेळी आप...

विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा

 शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ!

विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा

मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ला अधिकृत मंजुरी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाईल.


या महत्त्वपूर्ण निर्णयाचा राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. मात्र, यामुळे सरकारी तिजोरीवर तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. लाडकी बहीण योजना आणि आता ही कर्जमाफी यामुळे आगामी काळात सरकारला मोठी आर्थिक काटकसर करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या कर्जमाफीची अधिकृत घोषणा सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या