पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल....

इमेज
माझ्यासोबत पळून नाही आलीस तर कुटुंबाला जिवंत सोडणार नाही ! १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...        माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझ्या मामांना, आजी आजोबाला जिवंत सोडणार नाही. तुझे फोटो व्हायरल करील असे म्हणत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग व पाठलाग करून धमकी दिल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.          पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा बाबुराव शिंदे (रा. बेलांबा ता. परळी) याने एका अल्पवयीन मुलीला मैत्री करण्यासाठी वारंवार त्रास दिला. मुलीने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग करणे सुरू ठेवले. गल्लीमध्ये पीडित मुलगी दूध आणण्यासाठी गेलेली असताना पाठीमागे येऊन त्याने तिला पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच "तू माझ्याशी बोलत नाहीस" तू माझ्यासोबत पळून नाही आलीस तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करील त्याचप्रमाणे तुझ्या मामा व आजी आजो...

चार-पाच थेंब पाऊस पडताच परळीचा वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

 महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा उघड!


चार-पाच थेंब पाऊस पडताच परळीचा वीजपुरवठा खंडित; नागरिक संतप्त

परळी वैजनाथ | प्रतिनिधी

परळी शहरात अवघे चार-पाच पावसाचे थेंब पडताच महावितरणचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आधीच उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांवर उकाड्यात रात्र काढण्याची वेळ आली.

विशेष म्हणजे अद्याप पावसाळ्याची खरी सुरुवातही झालेली नाही. केवळ किरकोळ पाऊस पडताच वीजपुरवठा खंडित होत असेल, तर मुसळधार पावसाच्या काळात परिस्थिती किती बिकट होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांची देखभाल, झाडांच्या फांद्यांची छाटणी आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्याचे महावितरणकडून दावे केले जातात. मात्र प्रत्यक्षात चार-पाच थेंब पावसातच वीज गायब होत असल्याने या दाव्यांची पोलखोल झाली आहे. कागदोपत्री तयारी आणि प्रत्यक्षातील निष्क्रियता यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे.

वीज खंडित झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक भागांतील नागरिकांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, वारंवार होणाऱ्या वीज खंडितीबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

"चार थेंब पावसात वीज जाते, मग मुसळधार पावसात काय होणार?" असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. महावितरणने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यात जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या