इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

💢 Digital Page 💢 माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस विशेष

    💢 Digital Page 💢


 


⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी वाढदिवस विशेष.......
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐

 -----------------------------------------
_*बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा संकल्प वाढदिवसाचा - ध्यास जनसेवेचा.....!*_


*परळीत जनता चॅरिटेबल हॉस्पिटल निर्माण करण्याचा संकल्पचित्रासह व्यक्त केला मनोदय*
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
       परळी शहराच्या चौफेर व सर्वंकष विकासात्मक, सकारात्मक जडणघडणीत योगदान देण्याची सातत्याने तळमळ माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांची दिसुन येते.या जनसेवेच्या ध्यासातुन त्यांच्या माध्यमातून अनेक रचनात्मक कार्य व उपक्रम परळीत कार्यान्वित आहेत.यावर्षीचा वाढदिवस समारंभपूर्वक करण्याचे त्यांनी टाळले आहे.मात्र वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक, समृद्ध संवेदना जपणारा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.परळीत जनता चॅरिटेबल हॉस्पिटल निर्माण करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. या संकल्पनेला तमाम परळीकरांचा प्रतिसाद मिळत आहे.
           राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेतून आज (दि.११) माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी वाढदिवसानिमित्त परळीचे माजी नगराध्यक्ष स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ नागरिकांच्या सुविधेसाठी व सर्वांचा इलाज अतिशय माफक पद्धतीने व्हावा या उद्देशाने परळीच्या अगदी जवळच एक "जनता चॅरिटेबल हॉस्पिटल" निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. तसेच "जनता चॅरिटेबल हॉस्पिटल" चे संकल्पचित्रही प्रकाशित केले आहे. या संकल्पनेला तमाम परळीकरांचा प्रतिसाद मिळत आहे. या संकल्पपुर्तीने परळी व परिसरातील नागरिकांना मोठा लाभ होईल.तसेच माफक दरात उपचार उपलब्ध होणार असल्याने सामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे.या संकल्पनेला मोठ्या प्रमाणावर नागरीकांचा प्रतिसाद व पाठबळ मिळत आहे.वाढदिवसाच्या दिवशी जाहीर केलेल्या जनसेवेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांना हजारो नागरिक, हितचिंतक यांच्या कडून कौतुक,सदीच्छा, शुभेच्छा व आशिर्वाद याचा वर्षाव होत आहे.
  -----------------------------------------


विशेष लेख: ✍️ प्रा.शामसुंदर दासुद मो. 9423790599

जनसामान्यांचे बाजीराव....

माजातील सामान्य व अतिसामान्य माणूस हा राजकारणाकडे जरा तिरकस नजरेनेच पाहत असतो. त्याच्या मनात राजकारण आणि राजकारणी व्यक्तींविषयी साशंकता असते परंतु काही लोक राजकारणाविषयी सर्वसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होत असतात. आपले सर्वांचे लाडके नेतृत्व ना. धनंजय मुंडे साहेब हे याबाबतीत सर्वोत्तम उदाहरण आहेत. मुंडे साहेब, वाल्मीक अण्णा आणि साहेबांच्या टीम मधील काही मोजकेच लोक राजकारण हे सामान्य, सर्वसामान्य आणि अतिसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात किंवा त्यांना यात सहभागी करून घेण्यात यशस्वी झाले आहेत. यातीलच एक नाव म्हणजे ज्याचा आज वाढदिवस आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान शहराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी होय .

                साधारणपणे मागच्या 20 ते 22 वर्षापूर्वी मुंडे साहेबांच्या नेतृत्वात बाजीराव भैय्या यांनी युवा मोर्चाच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. आज ही राजकीय वाटचाल यशस्वीतेच्या एका महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे . ना. मुंडे साहेबांच्या सोबतची त्यांची ही यशस्वी वाटचाल अशीच अविरत पुढे राहील आणि उत्तरोत्तर प्रगती करत राहील याबाबतीत तिळमात्रही शंका नाही.


 सन 2011 ला नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर सन 2013 ते सन 2017 या काळात मुंडे साहेबांनी बाजीराव भैयांना नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. नेतृत्वाने बाजीराव यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत नगराध्यक्ष म्हणून परळीकरांच्या कायम स्मरणात राहील असा अतिशय उत्तम कारभार केला आणि मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवले. उत्तम कारभारा बरोबरच यापुढे येणाऱ्या काळात ना. मुंडे साहेबांच्या नेतृत्वात परळी नगर परिषदेची धुरा ही कायम राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील यासाठी त्यांनी जमीन तयार केली. परिणामी त्यानंतरच्या नगरपरिषद निवडणुकीत विक्रमी मताधिक्‍याने राष्ट्रवादी काँग्रेसने परळी नगरपरिषदेत विजय संपादन केला.

नगराध्यक्षपदाची यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यानंतर साहेबांनी त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपविली. सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बाजीराव भैय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून केलेले कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आहे. परळी शहर हे परळी तालुका आणि परळी मतदारसंघासाठी महत्वाचे आणि दिशादर्शक ठिकाण आहे. निवडणुकीच्या काळात परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक वातावरण निर्माण करण्यात किंवा राष्ट्रवादीची हवा निर्माण करण्यात परळी राष्ट्रवादी यशस्वी झाली होती , यात बाजीरावांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून केलेले काम हे निश्चितच मोलाचे ठरलेले आहे. या निवडणुकीत ना. मुंडे साहेबांचा ऐतिहासिक विजय आणि परळीकरांनी साहेबांना दिलेली अभूतपूर्व आघाडी आपल्या सर्वांच्या कायमच स्मरणात राहणारी आहे.

    बाजीराव धर्माधिकारी यांना त्यांचे आजोबा स्वर्गीय माणिकराव बाजीराव धर्माधिकारी यांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यामुळे ते त्यांच्या सार्वजनिक जीवनात राजकारण आणि समाजकारण याचा सुरेख समतोल राखण्यात यशस्वी झालेले आहेत. स्व.माणिकराव बाजीराव धर्माधिकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील अनेक गरजू व्यक्तींना मदत केली जाते, यामध्ये रुग्णांसाठी रुग्णवाहिका, रक्तदान शिबिर, अनाथ आश्रमांना मदत, विविध शाळांना शालेय स्तरावर मदत, ज्येष्ठ नागरिकांना विविध माध्यमातून मदत अशा अनेक समाज उपयोगी कार्यातून समाज सेवा करण्याच्या कामात आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून बाजीराव भैया यांचा मोलाचा वाटा असतो. ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या सेवाभावी मदती बरोबरच राजकीय माध्यमातूनही अनेकांना मदत करण्याचे कार्य बाजीराव भैया यांच्याकडून होत असते. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आणि साहेबांची राजकीय धुरा सांभाळणारे आदरणीय वाल्मीक अण्णा कराड यांच्या माध्यमातून अनेक लोकांची कामे मार्गी लावण्याचे काम बाजीराव भैय्या हे सतत करत असतात. यातून लोकांची कामे तर मार्गी लागतातच परंतु नेतृत्वावरील लोकांचा विश्वासही द्विगुणित होण्यास मदत होते. एवढेच नाही तर अडचणीत असणाऱ्या परिचित-अपरिचित लोकांना वैयक्तिक स्तरावर देखील बाजीराव भैया कडून मदत केली जात असते. एखाद्याचे दवाखान्याचे काम असेल, मुलीचा विवाह असेल, शैक्षणिक अडचण असेल किंवा अन्य काही अडचण असेल तर बाजीराव त्यासाठी अनेक लोकांना आपल्या वैयक्तिक स्तरावर मदत करत असतात. अतिशय संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे बाजीराव भैय्या हे लोकांना मदत ही तेवढ्याच नम्रपणे करत असतात.


राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून पक्षाचे काम करत असताना पक्षाचे संघटन मजबूत करणे, त्यात वाढ करणे याचाही प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे ते करत असतात. प्रत्येक जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना आदराची आणि आपुलकीची वागणूक देऊन पक्षासाठी प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता हा आपल्या पक्षाबरोबर आणि नेतृत्वाबरोबर जोडून ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.

       सार्वजनिक जीवनात आपल्या कार्यकुशलतेची चुणूक दाखवत बाजीराव भैय्या यांनी अनेक पदे भूषविली आहेत. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि पक्षाचे शहराध्यक्ष या दोन महत्त्वाच्या पदाव्यतिरिक्त वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि यशस्वीरीत्या निभावलेल्या आहेत. वि. दा. सावरकर संस्थेचे चेअरमन, स्व. माणिकराव बाजीराव धर्माधिकारी च चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, डाॅ.बा. आ. मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट मेंबर, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या परळी शाखेचे अध्यक्ष, नवकिरण सुशिक्षित बेरोजगार संस्थेचे अध्यक्ष, नाथ प्रतिष्ठानचे विश्वस्त, जवाहर एज्युकेशन सोसायटीचे संचालक, नवशक्ती क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अशी विविध पदे भूषवणारे बाजीराव भैया हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सन्मान पदक दिल्ली, बाबू जगजीवन राम कला अकादमी पुरस्कार दिल्ली, यासारख्या महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेला आहे.

  अशा या कर्तुत्ववान संयमी सुसंस्कृत मृदुभाषी, नावाने व कर्तुत्वाने बाजीराव असूनही सर्वसामान्यांच्या मनात भैया म्हणून घर करून राहणाऱ्या तरुण नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अशीच प्रगती होत राहो, आपल्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो आणि समाजातील गोरगरीब जनतेची, गरजवंतांची सेवा आपल्या हातून आणि ना. मुंडे साहेबांच्या माध्यमातून कायमच घडत राहो ऐवढीच सदिच्छा ...........

       ✍️प्रा. शाम दासुद मो. 9423790599

-  ----------------------------------------

विशेष लेख: ✍️ श्रीकांत मांडे मो.९६८९८३५७७७

आश्वासक आधार...........!

राजकीय क्षेत्रातील पद,प्रतिष्ठा आणि डामडौलाचे महत्व व त्याची स्मृती अल्पजीवी असते.सामाजिक क्षेत्रातील विधायक व रचनात्मक कार्याला दातृत्वाचा अलंकार लाभला की व्यक्ती समष्टीसाठी अधिक मोलाची ठरते. अडचणीच्या काळात मदत मिळणारच असा विश्वास प्रत्येकाला वाटेल असे व्यक्तिमत्व म्हणजे स्व.माणिक बाजीरावच असे त्यांच्या काळात अनेकांना वाटत असे,याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यांचा नातु व माझा पुतण्या बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे व्रत स्विकारले आहे.आज समाजातील प्रत्येक घटकाला भैय्या म्हणजे एक आश्वासक आधार वाटतो, हीच त्यांची लौकिक अर्थाने खरी श्रीमंती आहे.


शहरातील ज्येष्ठ नागरिक ते युवकांपर्यंत सर्व घटकांना आपला आणि विशेष म्हणजे कामाचा वाटणारा नव्या दमाचा राजकीय नेता म्हणून बाजीराव भैय्या धर्माधिकारी हे नाव दशदिशातुन ऐकण्यास मिळते हीच त्यांच्या कर्तृत्व,नेतृत्व,दातृत्व आणि संघटन कौशल्याची पावती आहे.... क्रिकेट खेळण्याचा छंद आणि त्यातून एक उत्तम खेळाडू म्हणून त्यांच्या भोवती गोळा होणाऱ्या तरूणांना प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन करून प्रसंगी नव्या नव्या टीमला आर्थिक मदत करणे,नंदागौळ रोडवर स्वतःच्या शेतात खेळासाठी मैदान तयार करून शहरात क्रिकेट चे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले, यातुनच नां.धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क व त्यातून घनिष्ठ मैत्री व पुढे राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग अशा प्रवासात अनेक सामाजिक उपक्रम राबविले. ईव्हेंट,प्रत्यक्ष गरजुंपर्यंत मदत पोहचवणे,स्वज्ञातीच्या संघटनेला बळकट करून लक्षावधी रुपयांचा निधी आमदार, खासदार फंडातून उपलब्ध करून ब्राह्मण सभेचे भव्य सभागृह,श्री काळाराम मंदिराच्यावर स्व.माणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृहाची उभारणी केली.आजोबांच्या नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.नगर परिषद अध्यक्ष म्हणून बाजीराव भैय्या ची कारकीर्द परळीकरांच्या लक्षात प्रदिर्घ काळ राहील, भविष्यातही तेच नगराध्यक्ष व्हावेत अशी इच्छा परळीकर जाहीरपणे व्यक्त करतात. लाॅकडाऊनच्या काळातील भैय्या धर्माधिकारी यांनी झपाटल्यासारखे काम करून हजारो नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले हे सर्वज्ञात आहेच परंतु समाजातील प्रत्येक घटकाला अन्न,वस्त्र आणि प्रसंगी आर्थिक मदत दिली हे ही सर्वज्ञात आहे.

सामाजिक बांधिलकी हा शब्द केवळ उच्चारून नव्हे तर प्रत्यक्ष जगताना कशी अमलात आणावी याचे उदाहरण केवळ भैय्या धर्माधिकारीच ठरू शकतात,त्याचे कारण कविवर्य अनिलांच्या या ओळी....

"अवघ्या अभाग्यांचे अश्रू उभे आमच्या डोळ्यात",

"दुःखितांच्या वेदनेच्या कळा उरात आमच्या हो" 

या भावनेने भैय्या धर्माधिकारी सतत कार्यरत आहेत.

स्व.माणिक बाजीराव या नावाचे वलय माझ्यासारख्या ज्येष्ठांना आकर्षित करते, परंतु नातवाच्या तिसऱ्या पिढीने आपल्या आजोबांच्या नावाची प्रतिष्ठा स्वतःच्या कर्तृत्वाने वाढविल्याचे उदाहरण हल्लीच्या काळात सापडणे तसे कठीणच. सांप्रत काळातील राजकारणात स्व-ज्ञाती संख्याबळाचे महत्त्व आणि प्रतिगामी शक्तींना मिळत असलेला राजाश्रय अशा प्रतिकुल परिस्थितीत परळी शहरात सोशल इंजिनिअरिंग चा प्रयोग यशस्वी करून प्रदिर्घ काळ सामाजिक ऐक्य आणि सलोखा टिकवून ठेवणे हे तसे अवघड कार्य,परंतु बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी या क्षेत्रात निष्ठेने काम केले हे लक्षात घेतले पाहिजे. राजकीय क्षेत्रातील यश-अपयशाचे गणित हे निवडणूकांवर बेतलेले असते.प्रतिस्पर्धी,विरोधक,गटा तटाचे म्होरके यांची कारस्थाने सतत चालत असतात.पक्षातील स्थान,नेत्याचा उजवा की डावा हात म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या भानगडीत न पडता निष्ठेने व विश्वासाने आपल्या नेत्याला समर्थ साथ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हा अत्यंत महत्त्वाचा गुण अपवादानेच एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांत आढळत असतो,त्या दृष्टीने आमचे नेते नामदार धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक बाजीराव भैय्या धर्माधिकारी हे त्या अपवादाची पोकळी भरून काढणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत असे स्वतः ना.धनंजय मुंडे साहेब देखील मान्य करतील (अर्थात राजकाणाच्या नियमानुसार अघोषित पणे). बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व ज्येष्ठतेनुसार शुभाशीर्वाद.💐💐*-      

                                                    -  श्रीकांत मांडे

---------------------------------

*कोरोनाच्या संकटामुळे समारंभपूर्वक वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय*

🕳️  _सर्वांचे प्रेम सदैव माझ्या साठी उर्जादायी; अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन_ 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी ---- : 

          बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे.अनेक जीवाभावाचे लोक जग सोडून गेले आहेत.या भिषण व भयावह परिस्थितीत संवेदना ठेवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  येत्या ११ ऑगस्ट रोजी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्वांचे प्रेम सदैव माझ्यासाठी उर्जादायी असुन वाढदिवसा वरील उत्सवी स्वरुपातील अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन  त्यांनी केले आहे.

      कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती गंभीर असून परळी शहर देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिणामांना सामोरे जात आहे.अनेकजण जीवाभावाचे लोक जग सोडून गेले आहेत. या परिस्थितीत समारंभ पुर्वक वाढदिवस करणे मनस्वी टाळावे वाटते. सर्वांच्या शुभेच्छा - आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात, परंतु  कोरोनाशी व या भयावह परिस्थितीशी लढण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे.  स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, कोरोनाला बीड जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातून कायमचे हद्दपार करण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात, याच माझ्यासाठी यावर्षीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील असेही बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी म्हटले आहे.


*माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दि.११ रोजी रक्तदान शिबिर*

🕳️ _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......

      परळी शहरातील कर्तृत्ववान युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात येणार आहे. 

         बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळ, परळी वै. बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 पासून स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे "रक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 10 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारा हा सामाजिक उपक्रम ठरला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम ठरला आहे.रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे.रक्तदानासारख्या उदात्त कार्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन बाजीराव भैया धर्माधिकारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

-------------------------------

व्हिडिओ:केशव बडवे...........

            विधायक कार्य घडो....  

           आदरणीय ना. श्री.धनंजयजी मुंडे साहेब सामाजीक न्याय मंत्री यांचे अत्यंत विश्वासू, परळी च्या राजकारणात सर्वांच्या तोंडात एकच नाव, आबाल,वृद्ध, विरोधक, स्वकीय, परकीय कोणीही असोत हासत हसत प्रत्येकाला आपलेसे करणारे युवकांचे हृदय सम्राट, कार्यमग्न, नवीन नवीन कल्पना चे भांडार साक्षात सर्व गुण संपन्न, अभ्यासू खिलाडी, कमी वयातील परळी भूषण, समाजकारण करण्यात कोणीही त्यांचा हात पकडू शकत नाहीत असे, प्रसिद्ध मा.नगराध्यक्ष, विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस चे धडाडी चे शहरातील अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर पतसंस्थेचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट मेंबर, अखिल भारतीय नाट्य परिषद परळी अध्यक्ष, विविध संस्था चे अध्यक्ष, युवकांचे श्रद्धास्थान, कामाच्या व्यापात २४ तास रममाण राहणारे, डिजिटल, सोशल मीडिया अपडेट माहिती देणारे, पेशवा बाजीराव ऊर्फ भैय्या साहेब धर्माधिकारी यांना ग्रामदैवत प्रभू वैद्यनाथ सामाजिक कार्य कारणासाठी उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देवो नेते आपणास प्रकट दिनाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा आपल्या हातून कायम विधायक कार्य घडत राहो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना.
                     ✍️ अॅड.गिरिष राजुरकर
-----------------------------------------------------------


मित्रवर्य, पाठीराखा, आधारवड..

मा. बाजीराव भैय्या धर्माधिकारी

     एक कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष, शहराध्यक्ष आणि समाजसेवक कसा असावा, जनतेच्या सेवेत तन मन धनाने स्वतःला कसे झोकून द्यावे याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे भैय्या..

      दरवेळी परळीतील नागरिकांच्या संकटकाळी व सुखदुःखात आधार देण्याची आणि जनसामान्यात मिसळून मा. धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वातुन, मार्गदर्शनातून जनसामान्यांची मदत करण्याची तुमची तळमळ, पक्षाच्या ध्येय धोरणातून समजोन्नती करीता विविध कार्य आणि समाजोपयोगी आधार महोत्सव, आरोग्यसेवा सारखे उपक्रम योजने, यासारख्या अनेक कार्यातून तुमच्या जनसेवेचा वसा दिसून येतो.


       सर्वात तरुण नगराध्यक्ष, कर्तव्यदक्ष शहराध्यक्ष, समाजातील प्रत्येक घटकाची आपुलकीने मदत करण्यास तत्पर आणि प्रत्येकाला आपल्या परिवारातील सदस्य वाटावा असा भाऊ. पण इतक्या कमी वयात मानाची उच्चतम पदे भूषविणारे भैय्या हे तरुणाई करिता आदर्शच आहेत..

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट मेम्बर, मराठी नाट्य परिषद परळीचे अध्यक्ष, स्वा. विदा सावरकर पतसंस्थेचे चेअरमन, अनेक विविध संघटना आणि संस्थांच्या माध्यमातून लाखो लोकांना मदत करणारे भैय्या आम्हा सर्व मित्रांचा अभिमान आहेत...

        भैय्या,, प्रभू वैद्यनाथ आपणास उदंड व निरोगी आयुष्य देवो याच मनःपूर्वक शुभेच्छा💐🎂

                        ✍️  जितेंद्र नव्हाडे, परळी वैजनाथ.



*माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल १११ दात्यांचे रक्तदान !*


🕳️ *_महिला रक्तदात्यांचा हिरिरीने सहभाग; दाम्पत्यांनी जोडीने येउन केलं रक्तदान_*

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......
     ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज (दि.११) रोजी आयोजित रक्तदान शिबिराला कोरोनाकाळातही दरवर्षी प्रमाणेच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात तब्बल १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांनी हिरिरीने सहभाग घेतला तर काही दाम्पत्यांनी जोडीने येउन रक्तदान केले.



       राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे "रक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले होते. सकाळी या शिबिराचा शुभारंभ डॉ.सुरेश चौधरी, श्रीकांत मांडे, नारायणदेव गोपनपाळे, जाबेरखाॅं पठाण, प्रभाकर देशमुख, डॉ.गुरुप्रसाद देशपांडे, भालचंद्र तांदळे, विलास ताटे, अरुणराव टिंबे, रघुनाथराव कावरे, वैजनाथ बागवाले,अमर देशमुख,अनंत इंगळे, रमेश चौंडे, अनिल अष्टेकर, अजिज कच्छी, जयराज देशमुख, गोविंद कुकर, रवी मुळे, के.डी. उपाडे, शंकर कापसे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. हे रक्तदान शिबिर परळीत गावभागाची एक परंपरा बनली असुन अविरतपणे ही सेवा सुरू ठेवली पाहिजे असे प्रतिपादन डॉ.सुरेश चौधरी यांनी केले. सेवेचा हा वारसा असुन तो जीवापाड जपण्याचा प्रयत्न करणार्या बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त साजेसा असा उपक्रम असल्याचे श्रीकांत मांडे यांनी सांगितले तर रक्तदान शिबिरा सारखे उपक्रम वारंवार राबबवुन खरी गरज हा उपक्रम भागवत असल्याचे कौतुक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.गुरुप्रसाद देशपांडे यांनी केले.





        दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 10 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारा व मोठ्या सहभागाचे शिबीर म्हणून हा सामाजिक उपक्रम परळीत अग्रेसर ठरलेला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे. यावर्षीही या शिबिरात रक्तदात्यांची उत्स्फूर्तता मिळाली. भालचंद्र रक्तपेढी लातुर द्वारा या शिबिरात रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली.भालचंद्र रक्तपेढी लातुरचे डॉ.योगेश गवसाणी, दिगंबर पवार, किशोर पवार, जयप्रकाश सुर्यवंशी, अरुण कासले, बालाजी वेदपाठक, नितीन क्षीरसागर, अन्सार शेख आदींनी सेवा बजावली.




      या शिबिरात तब्बल १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे विशेष म्हणजे महिला रक्तदात्यांनी हिरिरीने सहभाग घेतला तर काही दाम्पत्यांनी जोडीने येउन रक्तदान केले. कोरोनाकाळ असतांनाही मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद या शिबिराची यशस्वीता ठरली.शिबिर यशस्वी करण्यासाठी बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाने अथक परिश्रम घेतले.
----------------------------------------------------------------------------
माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त जयराम गोंडे यांच्या वतीने २११ महिलांना साडी वाटप
परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......
         परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व  परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रिय शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या  वाढदिवसानिमित्त आज (दि.११) रोजी स्माईल फोटो स्टुडिओ चे संचालक जयराम गोंडे यांच्या वतीने २११ महिलांना साडी वाटप करण्यात आले.
 

    
 माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी गंगासागर नगर भागात जयराम गोंडे यांच्या वतीने  साडी वाटप उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमाला जेष्ठ नेते श्रीकांत मांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अनंत इंगळे, पत्रकार प्रा.रविंद्र जोशी, प्रताप धर्माधिकारी ,चारुदत्त करमाळकर, अविनाश जोशी, रंगनाथ सावजी, श्रीकांत माने, प्रशांत नाईक, गणेश शिंदे, जयराम गोंडे ,गिरीश प्रयाग, सचिन स्वामी, केदार कुलकर्णी, रवी सोरडगे, केशव बडवे,नरहरी जाधव, महेश देशपांडे,अनिता गोंडे, कमलाबाई नाईकवाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!