MB NEWS:शेतकऱ्यांना भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्या - पंकजाताई मुंडे
शेतकऱ्यांना भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्या - पंकजाताई मुंडे
नांदेड जिल्हयात थेट बांधावर जाऊन केली अतिवृष्टीची पाहणी ; शेतकऱ्यांशी साधला संवाद
नांदेड दि. २० ------मराठवाडयात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटात सापडला असून त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहण्याची आज खरी गरज आहे, त्यासाठी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाविलंब भेदभाव न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी. 'दसरा गेला, आता त्यांची 'दिवाळी तरी गोड करा' अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे आग्रही मागणी केली.
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पंकजाताई मुंडे हया मराठवाडयाचा दौरा करत असून आज त्यांनी नांदेड जिल्हयातील धनगरवाडी ता. नांदेड, कारेगाव, पारडी ता. लोहा येथे बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. रस्त्यावर पाहणी न करता त्यांनी थेट शेतापर्यंत जाऊन
संकटात सापडलेल्या बळीराजाशी संवाद साधत त्यांना धीर दिला.
शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, शेतकरी सध्या आसमानी व सुलतानी अशा दोन्ही संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याची व मदत करण्याची खरी गरज आहे. शेतकरी उपाशी राहू नये याची खबरदारी सरकारने घ्यावी तसेच पंचनामे करताना भेदभाव झाला नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या पिकांना विनाविलंब सरसकट नुकसान भरपाई द्यावी, त्यांचा दसरा गेला, आता दिवाळी तरी गोड करावी. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कसलीही चालढकल न करता राज्य सरकारने पुढे यावे तथापि, केंद्र सरकारचा विषय असेल तर त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू असेही त्या यावेळी म्हणाल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा