MB NEWS-देशात महिला सुरक्षित नाहीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सौ शोभना बद्दर
उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेतील नराधमांना तात्काळ फाशी द्या ;
देशात महिला सुरक्षित नाहीत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - सौ शोभना बद्दर
परळी वैजनाथ दि ४ ( प्रतिनिधी ) :- हैदराबाद येथील समशाबाद येथील घटनेस एक वर्ष पूर्ण होत नाही तोच उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी लज्जास्पद घटना घडली. एका अबला महिलेस गॅंग रेप करून तिचे हाल हाल करीत तिच्या जिवाशी खेळ खेळला गेला त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा सदर घटनेतील नराधमांना तात्काळ काशी द्या आणि देशांमध्ये महिलांचे अस्तित्व धोक्यात असून महिला सुरक्षित नाहीत. त्याची लाजत का असेना जबाबदारी स्वीकारून तात्काळ केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभना बद्दर यांनी केली आहे.
गेली १० महिन्यांपूर्वी म्हणजे २७ नोव्हेंबर २०१९ रोजी हैदराबाद येथील समशाबाद याठिकाणी अशाच एका निष्पाप व्हेटरनरी महिला डॉक्टरवर रात्री ड्युटीवरून घरी जात असताना चार ते पाच नराधमांनी आडवून तिच्यावर गॅंग रेप करीत तिची निर्गुण हत्या केली आणि तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी जळाल्या स्थितीत आढळला. या घटनेने संपूर्ण हिंदुस्थान देशात एक प्रकारची संतापाची लाट उसळली होती. सदर घटनेतील सर्वच नराधमांना ६ डिसेंबर २०१९ रोजी या ठिकाणच्या पोलिसांनी एन्काऊंटर करीत त्यांचा खात्मा केला. सदर घटनेस दहा महिन्यांचा कालावधी उलटत नाही तोच उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी चार ते पाच नराधमांनी मनीषा वाल्मिकी हिचा अतिशय क्रूरपणे गँग रेप करून, कंबर मोडून, मान मोडून, हात-पाय तोडून, कोणाला काही सांगू नये म्हणून तिची जीभ सुद्धा कापण्यात आली. नराधमांच्या अशाप्रकारच्या छळाने मनीषा ही गंभीररीत्या जखमी झाली आणि तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. १५ दिवसांपासून तिची मृत्यूशी झुंझ सुरु होती मात्र २९ रोजी अखेर तिची प्राणज्योत मालवली. हे प्रकरण माणुसकीला काळिमा फासणारे असून तिथल्या पोलीस यंत्रणेने वास्तव दडपण्याचे काम केले आहे.
त्या ठिकाणच्या पोलिसांनी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर केलाच केला मात्र त्या ठिकाणच्या निष्क्रिय सरकारनेदेखील पिडित महिलेच्या कुटुंबीयांना अंधारात ठेवून प्रकरण दडपत असलेली पोलिस यंत्रणा आणि नराधमांना एक प्रकारचा पाठीशी घालण्याचा प्रयत्नच केला आहे. सरकारने त्या पिडीत कुटुंबाला कसलीच मदत केली नाही उलट त्या कुटुंबाला दबावाचे तंत्र वापरून हे प्रकरण रफा-दफा करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. असे सांगून शिवसेनेच्या माजी नगरसेविका शोभना बद्दर यांनी म्हटले आहे की, सदर प्रकरण हे माणुसकीला काळीमा फासणारे असून दिवसेंदिवस देशांमध्ये अशा लज्जास्पद घटना घडतच आहेत. त्यामुळे महिला आणि मुली स्वतःला असुरक्षित समजत आहेत. त्याच बरोबर प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करणाऱ्या पोलीस आणि पीडितेच्या कुटुंबियांना मीडिया तसेच कोणत्याही राजकीय - सामाजिक कार्यकर्त्यांना नेत्यांना वास्तविकता झाकून ठेवण्यासाठी भेटू दिले नाही यास जबाबदार धरून उत्तरप्रदेशातील योगी सरकार बरखास्त करण्यात यावे. ज्या पोलिसांनी मध्यरात्री मनीषा वाल्मिकीचा मृतदेह कुटुंबाला न कळवता पुरावा नष्ठ करण्याच्या उद्देशाने परस्पर जाळला त्या पोलीस अधिकार्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे. पिडित मनीषाचे कुटुंबीय सध्या या ठिकाणची पोलीस आणि सरकार यांच्या प्रचंड दबावाखाली असून पोलिस आणि उत्तर प्रदेश सरकार पिडित कुटुंबीयांना न्याय देऊन संरक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर वास्तविकता जपण्यासाठी प्रचंड दबावतंत्राचा वापर करीत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी हैदराबाद नंतर हाथरस याठिकाणी दुसरी घटना घडली. यामुळे देशातील महिला - मुली स्वतःला असुरक्षित समजत असून केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री आणखी अशा किती घटनांची वाट पाहणार आहे असा सवाल करीत नगरसेविका शोभना बद्दर यांनी म्हटले आहे की, सदर प्रकरण हे जलदगती न्यायालयात चालून त्या चारही नराधमांना तात्काळ फासावर लटकवावे आणि सदर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतःला लाजत का असेना आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा