इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांचे ऑनलाईन बदल्यांचे धोरण योग्यच ; यापुढेही तेच धोरण राहणार* _*शिक्षक संघटनांच्या दबावापुढे महाविकास आघाडी सरकार अखेर झुकले !*_

*पंकजाताई मुंडे यांचे ऑनलाईन बदल्यांचे धोरण योग्यच ; यापुढेही तेच धोरण राहणार* 


_*शिक्षक संघटनांच्या दबावापुढे महाविकास आघाडी सरकार अखेर झुकले !*_

मुंबई। दिनांक ०४ ।
ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता हे अखेर सिध्द झाले आहे. हा निर्णय रद्द करून ऑफलाईन बदल्या करण्याची महा विकास आघाडी सरकारची घोषणा हवेत विरली आहे. राज्यातील शिक्षकांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याने सरकारला माघार घ्यावी लागली असून यापुढे बदल्या हया ऑनलाईनच होणार आहेत, तसा आदेशच सरकारने काढला आहे.

  शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया अतिशय किचकट झाली होती शिवाय यात घोडेबाजारही होत होता, हा सर्व प्रकार थांबवून बदली प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक व्हावी यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना आग्रही भूमिका घेऊन ऑनलाईन बदली धोरण अवलंबिले होते. या धोरणाचे राज्यातील सर्व शिक्षकांनी स्वागत केले होते तथापि, राज्यात महा विकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन धोरण रद्द करून ऑफलाईन बदल्या करण्याचा निर्णय घेतला. 

*शिक्षकांना आली पंकजाताईंची आठवण !*
---------------------
राज्य सरकारच्या निर्णयामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या, त्यांनी ऑफलाईनला कडाडून विरोध दर्शविला. अखेर या आक्रमकतेपुढे सरकार झुकले आणि पंकजाताई मुंडे यांनी घेतलेला ऑनलाईन बदल्यांचा निर्णय कायम ठेवला. मंगळवारी मंत्रालयात झालेल्या शिक्षक संघटनांच्या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे आदेश काढले. देशाची भावी पिढी घडविणा-या शिक्षकांना बदल्यांसाठी त्रास होऊ नये, वारंवार खेटे मारावे लागू नये यासाठी बदली प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करणा-या पंकजाताई मुंडे यांची आठवण शिक्षकांना सातत्याने येत होती. बदली धोरण पुन्हा ऑनलाईन झाल्याबद्दल त्यांनी पंकजाताई मुंडे यांचे मनापासून आभार मानले.
••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या