इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- सौ.जयश्री नावंदे यांचे दुःखद निधन आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांना पत्नीशोक

 सौ.जयश्री नावंदे यांचे दुःखद निधन



आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांना पत्नीशोक

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

सौ.जयश्री अशोक नावंदे रा.परचुंडी ह.मु.परळी वैजनाथ यांचे सोमवार दि.10 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 45 वर्ष वयाच्या होत्या. आदर्श शिक्षक अशोक नावंदे यांच्या त्या पत्नी होत. 

सौ.जयश्री अशोक नावंदे यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी परचुंडी येथे अंत्यविधी करण्यात आले. परळी शहरातील आदर्श शिक्षक तथा संगम येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक अशोक नावंदे यांच्या त्या पत्नी होत. सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमात त्या नेहमीच सहभागी होत.वीरशैव समाजातील धार्मीक, पारंपारिक कार्यक्रमातही त्या सहभागी होत. अत्यंत मिनमिळावू व सुस्वभावी असल्याने त्या सर्वपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.ं प्रेस फोटोग्राफर भीमाशंकर नावंदे यांच्या त्या वहिनी होत. नावंदे कुटूंबियांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!