दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-.....अन्यथा राज्यात मुंडन आंदोलन करणार -सुरेंद्र कावरे

  .....अन्यथा राज्यात मुंडन आंदोलन करणार -सुरेंद्र कावरे



परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

लोकांनी अन्नधान्य दिल्यानंतर ज्यांची उपजीविका भागते अश्या गावगाढा चालवणार्‍या बलुतेदारांना राज्य सरकारने मदत जाहीर केली नाही. जर बारा बलुतेदारांवर अन्याय होत असेल तर राज्यात लवकरच नाभिक समाज राज्य सरकारच्या निषेधार्ध मुंडन आंदोलन करून आपल्या बंद दुकानावर जाहीर निषेधाचे फलक लावणार आहे. असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशअध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी दिला आहे.  नाभिक समाजाच्या २९ आत्महत्या झाल्या एका ही लोकप्रतिनिधीने साधी चौकशी ही केली नाही किंवा कसलीही मदत पण केली नाही राज्य सरकारने या २९ कुटुबिंयाना १० लाखाची आर्थिक मदत लवकर जाहीर करावी घरातील कर्ता मानुस गेल्यामुळे कुटुंब उघडयावर पडले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सुुतार,लोहार,कुभांर,धोबी यांच्या सारख्या अनेक छोटया छोटया अनेक व्यवसायीकांवर कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेक जन व्यवसायिक शहर सोडुन गावाकडे तर कोणी शेताकडे जाऊन राहिले आहेत हे लॉकडॉउन किती दिवस चालणार आहे हे कोणी सुध्दा सांगु शकत नाही गेली दोन महिने झालेदुकानदारी बंद आहे बलुतेदारांना जगण्याचे साधन ही उरले नाही कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थितीत जगायचे कसे. या अगोदर राज्य शासनाला अनेक निवेदन दिले आंदोलन केली.

तरी कसली ही मदत राज्य सरकराने केली नाही. झोपेचे सोंग घेणार्‍या या राज्य सरकारला झोपेतुन जागे करण्यासाठी आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने राज्य शासनाच्या विरूध्दात मुंडन आदोंलन लवकर करण्यात येणार आहे असा ईशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी दिले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....