इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-.....अन्यथा राज्यात मुंडन आंदोलन करणार -सुरेंद्र कावरे

  .....अन्यथा राज्यात मुंडन आंदोलन करणार -सुरेंद्र कावरे



परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

लोकांनी अन्नधान्य दिल्यानंतर ज्यांची उपजीविका भागते अश्या गावगाढा चालवणार्‍या बलुतेदारांना राज्य सरकारने मदत जाहीर केली नाही. जर बारा बलुतेदारांवर अन्याय होत असेल तर राज्यात लवकरच नाभिक समाज राज्य सरकारच्या निषेधार्ध मुंडन आंदोलन करून आपल्या बंद दुकानावर जाहीर निषेधाचे फलक लावणार आहे. असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशअध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी दिला आहे.  नाभिक समाजाच्या २९ आत्महत्या झाल्या एका ही लोकप्रतिनिधीने साधी चौकशी ही केली नाही किंवा कसलीही मदत पण केली नाही राज्य सरकारने या २९ कुटुबिंयाना १० लाखाची आर्थिक मदत लवकर जाहीर करावी घरातील कर्ता मानुस गेल्यामुळे कुटुंब उघडयावर पडले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सुुतार,लोहार,कुभांर,धोबी यांच्या सारख्या अनेक छोटया छोटया अनेक व्यवसायीकांवर कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे अनेक जन व्यवसायिक शहर सोडुन गावाकडे तर कोणी शेताकडे जाऊन राहिले आहेत हे लॉकडॉउन किती दिवस चालणार आहे हे कोणी सुध्दा सांगु शकत नाही गेली दोन महिने झालेदुकानदारी बंद आहे बलुतेदारांना जगण्याचे साधन ही उरले नाही कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थितीत जगायचे कसे. या अगोदर राज्य शासनाला अनेक निवेदन दिले आंदोलन केली.

तरी कसली ही मदत राज्य सरकराने केली नाही. झोपेचे सोंग घेणार्‍या या राज्य सरकारला झोपेतुन जागे करण्यासाठी आता महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने राज्य शासनाच्या विरूध्दात मुंडन आदोंलन लवकर करण्यात येणार आहे असा ईशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र कावरे यांनी दिले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या