मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS-पीक विम्यासाठी लाल वादळ बीडमध्ये..... *जिल्ह्याभरातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग*(Video)

 *पीक विम्यासाठी लाल वादळ बीडमध्ये.....


*जिल्ह्याभरातील हजारो शेतकऱ्यांचा सहभाग*


*बीड:दि 30 प्रतिनिधी*

अखिल भारतीय किसान सभा जिल्हा बीड च्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी गेल्या 2020 च्या खरीप हंगामा अखेरीस झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पीकविमाधारक शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने विमाप्रावधानातील अव्यवहार्य नियम व अटी लावून नुकसान भरपाई पासून वंचित ठेवल्याच्या नाराजीने व जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने आपले अवधान वेधून घेण्यासाठी बीड मध्ये निदर्शने करण्यात आले आले.

२०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या सर्व पीकनुकसानीचे शासनाच्या महसूल विभागाने केलेले पीक पंचनामे केलेले आहेत व शेतकऱ्यांना मदत ही केली मात्र जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेले असताना महसूल विभागाने केलेले नुकसानीचे पंचनामे गृहीत धरून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा देण्यात यावा.तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना जाचक ठरणा-या अव्यवहार्य अटी शतींचा फेरविचार करून त्या वगळून ही योजना शेतकऱ्यांना झालेल्या पीक नुकसानाची भरपाई मिळण्यास सुलभ करावी.आदी मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली यावेळी किसान सभेचे नेते कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ.दत्ता डाके,कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.मोहन लांब आदीसह जिल्ह्यातील किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी किसान सभेच्या शिष्ट मंडळाशी चर्चा करून राज्य शासनाच्यावतीने या बाबतीत लक्ष्य देऊन शेतकऱ्यांवर पीक विमा संदर्भात अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले.


जिल्ह्याभरातील हजरो शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होऊन रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर शेतकऱ्यांच्या घोषणा व हातातील लाल झेंडे बिडकरांचे लक्ष्य वेधून घेतले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....