इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-*एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा—प्रा.विजय मुंडे*

 *एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी महामंडळाला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा—प्रा.विजय मुंडे*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

परळी आगाराच्या वतीने तहसील कार्यालयवर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चास जाहीर पाठिंबा देत एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी परळी मार्केट कमिटीचे उपसभापती प्रा.विजय मुंडे यांनी केली


   परळी आगाराच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीच्या संदर्भात तहसील कार्यालयावर आपल्या मुलाबाळांसह मोर्चा काढण्यात आला एसटी महामंडळाला शासनात विलीनीकरण करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली.

   घोषणाबाजीने तहसील परिसर दणाणून गेला होता दरम्यान पाठिंबा दिल्यानंतर मोर्चा संबोधित करताना प्रा विजय मुंडे म्हणाले की कोरोणा काळात एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली त्यांनी केलेली मागणी ही न्याय आहे ही सरकारने मान्य करावी या संपामुळे सामान्य नागरिकांचा सुद्धा पाठिंबा मिळत असून प्रवाशांच्या खिशाला आर्थिक झळ बसत आहे खाजगी वाहन धारक प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत.

    दरम्यान कर्मचार्‍यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले तसेच राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच त्यांनाही मोबदला मिळाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले मोर्चास विविध राजकीय पक्ष व संघटना यांनीही पाठिंबा दर्शवला आहे

  एसटी मधील ड्रायव्हर ,कंडक्टर व मेकॅनिकल आणि इतर कर्मचाऱ्यांना अल्प वेतन असल्यामुळे नैराश्यातून जवळपास 39 लोकांनी आत्महत्या केली. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कोणीही आत्महत्या करू नये तसेच संघर्ष करूनच आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत त्यामुळे आत्महत्या सारखे पाऊल कोणत्याही कर्मचाऱ्यांनी उचलू नये असे आवाहन त्यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!