MB NEWS-सोयाबीन चोरीला गेल्याचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
सोयाबीन चोरीला गेल्याचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
अंबाजोगाई - सोयाबीनचे कट्टे चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्का बसल्याने वरपगाव येथील वयोवृद्ध शेतकरी रावण बाबुराव रिटरकर (वय ८०) यांनी मागील तीन दिवसापासून अन्न त्यागले होते. अखेर बुधवारी (दि.०९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव येथील शेतकरी रावण बाबुराव रिटरकर हे आपल्या कुटुंबासह स्वतःच्या शेतात राहत. रविवारी नातेवाईकांच्या लग्नासाठी ते आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन रिटरकर यांनी शेतात ठेवलेले दहा सोयाबीनचे कट्टे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यामुळे त्यांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रावण रिटरकर आणि त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना सोयाबीन चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरीच्या घटनेने रावण रिटरकर यांना जबर धक्का बसला आणि त्यांनी त्या दिवशीपासून अन्न त्यागले. अखेरीस बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर वरपगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रावण रिटरकर यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा