MB NEWS-सोयाबीन चोरीला गेल्याचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

  सोयाबीन चोरीला गेल्याचा धक्का बसल्याने वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू 

अंबाजोगाई -  सोयाबीनचे कट्टे चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्का बसल्याने वरपगाव येथील वयोवृद्ध शेतकरी रावण बाबुराव रिटरकर (वय ८०) यांनी मागील तीन दिवसापासून अन्न त्यागले होते. अखेर बुधवारी (दि.०९) सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

      अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव येथील शेतकरी रावण बाबुराव रिटरकर हे आपल्या कुटुंबासह स्वतःच्या शेतात राहत. रविवारी नातेवाईकांच्या लग्नासाठी ते आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते. घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन रिटरकर यांनी शेतात ठेवलेले दहा सोयाबीनचे कट्टे अज्ञात चोरट्याने चोरून नेले. यामुळे त्यांचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. रावण रिटरकर आणि त्यांचे कुटुंबीय घरी परतल्यावर त्यांना सोयाबीन चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरीच्या घटनेने रावण रिटरकर यांना जबर धक्का बसला आणि त्यांनी त्या दिवशीपासून अन्न त्यागले. अखेरीस बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू आला. दुपारी त्यांच्या पार्थिवावर वरपगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रावण रिटरकर यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !