MB NEWS-एकनाथ शिंदे बंडावर शिवसेना अॅक्शन मोडवर: आता आवाहन नाही तर आव्हान: पुरी तय्यारी है, अब हमारा चैलेंज है !
एकनाथ शिंदे बंडावर शिवसेना अॅक्शन मोडवर: आता 'आवाहन' नाही तर 'आव्हान': पुरी तय्यारी है, अब हमारा चैलेंज है !
एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाविरोधात केलेल्या बंडाचा आज चौथा दिवस आहे.गेल्या तीन दिवसांमध्ये मुंबई, सूरत, गुवाहाटी येथे वेगाने घटना घडत आहेत.शिवसेना आणि काही अपक्ष असे 46 आमदार आपल्याबरोबर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे, तर दुसरीकडे सरकारने या आमदारांविरोधात काही कारवाई करता येते का, याचा विचार सुरू केला आहे.
'हम हार माननेवाले नही है, हम जितेंगे, फ्लोऱ ऑफ द हाऊस पे जितेंगे, जिसको हमारा सामना करना है वो मुंबई आ सकते है., अब टाइम निकल चुका है, उन्होने गलत कदम उठाया है. पुरी तय्यारी है, अब हमारा चैलेंज है', अशा भाषेत संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिलं आहे. सकाळी शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर त्यांनी या भाषेत बंडखोरांना मुंबईत येण्याचं आव्हानं दिलं.
बहुमताचा आकडा एकनाथ शिंदे यांनी आपल्याबाजूने आहे असे म्हटले आहे, यावर तुमचे मत काय आहे असे पत्रकारांनी संजय राऊत यांना आज शुक्रवारी सकाळी विचारले. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, "ही कायदेशीर लढाई आहे, काही नियम आहेत, काही सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. पाहू काय होतं ते. त्यांनी एक निर्णय घेतलाय. बहुमत हा फक्त चर्चेला. ते मुंबईत येतील तेव्हा बाळासाहेबांवरील भक्तीची शिवसेनेवरील श्रद्धेची कसोटी लागेल. महाविकास आघाडीच्या बाजूनेच आमदारंचा कौल असेल." आता महाराष्ट्रातील जनतेला मात्र यापुढे नक्की काय होणार, हे सरकार टिकणार की जाणार, गेले तर नवे सरकार कोणाचे असेल असे प्रश्न पडले आहेत.
-------------+++---+++++++++++----------
VideoNews पहा:● *दिंड्या परळी वैजनाथ पंचक्रोशीत दाखल.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा