दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-*परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा खडका बंधारा तुडूंब!* _नऊ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा_

   परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा खडका बंधारा तुडूंब!



_नऊ दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा_


परळी वैजनाथ, एमबी न्युज वृतसेवा......

    परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करणारा  खडका बंधारा १०० टक्के भरला असुन तुडुंबभरून ओसंडून वाहत आहे. जायकवाडीचे पाणीसोडण्यात आल्याने. या बंधाऱ्याचे नऊ दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा पुर्ण ओसंडून वाहत असल्याने परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राला लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.अखंडीत वीजनिर्मिती करण्याच्या दृष्टीने ही अतिशय समाधानाची बाब आहे.


       गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. या पावसाने तसेच जायकवाडीचे पाणी सोडण्यात आल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राला पाणी पुरवठा करीत असलेला सोनपेठ तालुक्यातील खडका बंधारा ओसंडूनवाहतआहे. बुुधवारी(दि.28) 13 पैकी 9 दरवाजे रात्री  उघडून पाणी सोडण्यात आले.  नदी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा बंधारा भरल्याने या बंधार्याखालील गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे.तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्राला याच ठिकाणाहून  पाणी पुरवठा होतो  त्यामुळे परळी वीज केंद्रासह सोनपेठ तालुक्यातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....