इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS:फुले -शाहू - आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक-पत्रकारांनी पुढाकार घ्यावा:- धनंजय आरबुने

 फुले -शाहू - आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक-पत्रकारांनी पुढाकार घ्यावा:- धनंजय आरबुने




परळ, प्रतिनिधी


फुले -शाहू -आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक- पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांनी केले. ते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे शहराध्यक्ष जगदीश शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरंडे ,व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार श्रीराम लांडगे, डिजिटल मीडिया तालुका सचिव दिपक गित्ते, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्षअमोल सूर्यवंशी, धीरज जंगले, प्रा.दशरथ रोडे आदींची उपस्थिती होती. 

या प्रसंगी धनंजय आरबुने पुढे म्हणाले की, महाराष्ट्रभूमी ही फुले -शाहू -आंबेडकर आणि पुरोगामी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.लोकराजा छत्रपती  राजर्षी शाहू महाराजांनी लोक कल्याणकारी निर्णय घेऊन विषमतावादी व्यवस्थेस आव्हान दिले . त्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना शिक्षणासाठी वसतिगृह काढले, बालविवाह सतीप्रथा बंद केल्या तसेच त्यांच्या राज्यात जलनीतीवर प्रभावी अंमलबजावणी केली. अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले त्यांनी आपल्या जीवन काळात घेतले. स्मृती अभिवादनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी  तर आभार नितीन ढाकणे यांनी मानले.या प्रसंगी पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....