इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:फुले -शाहू - आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक-पत्रकारांनी पुढाकार घ्यावा:- धनंजय आरबुने

 फुले -शाहू - आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक-पत्रकारांनी पुढाकार घ्यावा:- धनंजय आरबुने




परळ, प्रतिनिधी


फुले -शाहू -आंबेडकरी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी साहित्यिक- पत्रकारांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार धनंजय आरबुने यांनी केले. ते लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या १०१ व्या स्मृती दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.या अभिवादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे शहराध्यक्ष जगदीश शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरंडे ,व्हाईस ऑफ मीडियाचे पत्रकार श्रीराम लांडगे, डिजिटल मीडिया तालुका सचिव दिपक गित्ते, पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्षअमोल सूर्यवंशी, धीरज जंगले, प्रा.दशरथ रोडे आदींची उपस्थिती होती. 

या प्रसंगी धनंजय आरबुने पुढे म्हणाले की, महाराष्ट्रभूमी ही फुले -शाहू -आंबेडकर आणि पुरोगामी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते.लोकराजा छत्रपती  राजर्षी शाहू महाराजांनी लोक कल्याणकारी निर्णय घेऊन विषमतावादी व्यवस्थेस आव्हान दिले . त्यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना शिक्षणासाठी वसतिगृह काढले, बालविवाह सतीप्रथा बंद केल्या तसेच त्यांच्या राज्यात जलनीतीवर प्रभावी अंमलबजावणी केली. अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले त्यांनी आपल्या जीवन काळात घेतले. स्मृती अभिवादनकार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान साकसमुद्रे यांनी  तर आभार नितीन ढाकणे यांनी मानले.या प्रसंगी पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!