कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील शेतकर्याची आत्महत्या
कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील शेतकर्याची आत्महत्या
परळी वैजनाथ(प्रतिनिधी)
कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील 60 वर्षे वयाच्या वृध्द शेतकर्याने आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि.5 जुन रोजी घडली असुन याप्रकरणी दि.12 जुन रोजी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे.
परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी संजय ग्यानबा सलगर वय 60 वर्षे हे गावातच आपली शेती करतात.मागील एक वर्षांपासुन शेती पिकत नसल्याने संजय सलगर हे चिंताग्रस्त होते.यातच दि.5 जुन रोजी त्यांनी आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.याप्रकरणी त्यांचा मुलगा भानुदास संजय सलगर यांच्या खबरीवरुन परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केकाण हे करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा