इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी

 आत्मलिंगाची अनुभुती हेच शिवमहापुराण कथेचे सार -प.पु.कनकेश्वरी देवीजी

शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञास दुसर्या दिवशी भाविकांची गर्दी

परळी (प्रतिनिधी)

 शिवकथा ही मनुष्याला त्याग करायला शिकवते.शिवमहापुराण आत्मलिंगाची अनुभुती देते आणि हेच शिवमहापुराण कथेचे सार असल्याचे प्रतिपादन श्री श्री 1008 महामंडलेश्वर प.पु.माता कनकेश्वरी देवीजींनी केले.परळी येथील हालगे गार्डन येथे येथे महाशिवपुराण ज्ञानयज्ञात दुसरे पुष्प गुंफताना बोलत होत्या.

 परळी येथील हालगे गार्डन येथे बुधवार दि.६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ६ या वेळेत सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञात गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी माता कनकेश्वरी देवीजी कथेचे दुसरे पुष्प आपल्या सुमधुर वाणीतुन व संगीताच्या साथीने गुंफताना माता कनकेश्वरी देवीजी यांनी शिवमहापुराण कथेचे महत्व सांगताना आधुनिक काळात जीवन जगत असताना दान देणारा व दान स्विकारणारा कसा असावा यावर सविस्तर विमोचन केले.शरीर आत्म्याचा आधार नसुन आत्मा शरीराचा आधार आहे.हे जेव्हा समजेल तेव्हा शिवालयात प्रवेश झाला असे समजावे.परंतु आपण शरीरालाच आधार समजतो.ज्याला ही गोष्ट समजली त्याच्या अंगी शिवाचा वास असतो.जग बुध्दीमान,गुणवंत दात्यांच्या प्रभावात असले तरी ज्याला दुनियाकडुन काहीच अपेक्षीत नाही त्याला फक्त परमार्थ प्रभावित करत असतो.शंकर हा शब्द सगुन साकार रुपासाठी असुन,ते सद्गुरू रुपी आहेत.या महापुरुषांजवळ शिष्य,दास म्हणुन जावे लागते.आत्मलिंगाची अनुभुती हेच शिवमहापुराण कथेचे सार आहे.कलियुगाच्या प्रभावातून इतरांना वाचवण्यापेक्षा स्वतःला त्यापासून दुर ठेवणं हेच योग्य असुन अनेक जण इतरांना सुधारण्याच्या नादात स्वतः बिघडत असतात असे सांगितले.

       या कथेचा भाविकांनी श्रवण करुन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक सौ.जयश्रीताई प्रभु कोरे हिंपळनेकर,लातुर व पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथ शिवकथा समिती,परळी वैजनाथ यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट