इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

 परळी व अंबाजोगाई तालुक्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत 933  लाभार्थ्यांना ३ कोटी १० लक्ष रूपयांचा निधी वितरीत

आ.धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांचे श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेची सहाय्यक संस्थाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले आभार


आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांनी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो बेघर, बेसहारा अनाथांच्या डोळ्यातील पुसले अश्रु!


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदार संघाचे आ.धनंजय मुंडे व मंत्री पकजाताई मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या महिला व बाल विकास खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एकल पालकांच्या मुला-मुलांनी व दिव्यांगांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर स्वयंसेवी संस्था श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ व अंबाजोगाई यांची निवड झाली होती. या संस्थेच्या माध्यमातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेंतर्गत 933  लाभार्थ्यांना 3 कोटी 10 लक्ष रूपयांचा निधी खात्यात जमा करण्यात आला. आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांचे श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सचिन मुंडे व सहाय्यक संस्थाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार मानले आहेत.आ.धनंजय मुंडे व ना.पंकजाताई मुंडे यांनी परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो बेघर, बेसहारा अनाथांच्या डोळ्यातील अश्रु पुसले आहेत. 

       याबाबत अधिक माहिती अशी की, परळी व अंबाजोगाई तालुक्यात महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत एकल पालकांच्या मुली - मुलांना वयाच्या १ ते 18 वर्षापर्यंत अनुदान मिळते. कोरोना काळात ज्यांचे आई-वडील वारले आहेत. अशा पालकांच्या सर्व मुली-मुलांना तर ज्यांची आई किंवा वडील यांचे निधन झाले आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेत दिव्यांग मुलांचाही समावेश आहे. या योजनेसाठी श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ या संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड करण्यात आली होती. या संस्थेच्या माध्यमातून लाभार्थीचे अर्ज भरून घेऊन ९३३ लाभार्थीचे ३ कोटी १० लक्ष रुपये वितरीत करण्यात आले. 

    क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना एक अत्यंत उपयुक्त योजना आहे, जी अनाथ, बेघर आणि असुरक्षित मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते. या योजनेमुळे मुलांना योग्य संरक्षण, काळजी आणि विकासाच्या संधी मिळतात, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते. या योजनेमुळे अनेक मुलांना शिक्षण आणि योग्य पालन-पोषण मिळणार आहे.  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परळी व अंबाजोगाई तालुका स्तरावर श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ या संस्थेची स्वयंसेवी संस्थेस्था म्हणून निवड झाली होती. या संस्थेच्या माध्यमातून ९३३ लाभार्थी खात्यात निधी जमा झाला आहे. यासाठी तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तसेच मंत्री पंकजाताई मुंडे व महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे मार्गदर्शन मिळाले.


_*संस्थेचे तळमळीने काम...*_


        बाल संगोपनाच्या क्षेत्रामध्ये संस्था गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने तळमळीने काम करत असून संस्थेच्या माध्यमातून 933 लाभार्थ्यांना खात्यामध्ये निधी जमा झाला याबद्दल संस्थेच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


ना.पंकजाताई व आ.धनंजय मुंडे यांचे पाठबळ

       दरम्यान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांनी संस्थेच्या पाठीशी आपले पाठबळ उभे केले. संस्थेच्या या कामाला आशीर्वाद देत त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळेच या संस्थेच्या माध्यमातून वंचित व बेसहारा, गरजू मुलांना लाभ मिळवून देता आला. 933 लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला. मुलांना शिक्षण आणि योग्य पालन पोषण या माध्यमातून मिळणार आहे. याबद्दल ना. पंकजाताई मुंडे व आमदार धनंजय मुंडे यांचे मनापासून  या संस्थेने आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट