मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

Balochistan : पाकिस्तानचा तुकडा पडला, बलुचिस्तान आता स्वतंत्र देश; बलुच नेत्याने केली मोठी घोषणा

बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतःला वेगळं करत स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. ते म्हणाले की, बलुचिस्तान पाकिस्तान नाही. त्यांनी हिंदुस्थान आणि जागतिक समुदायाकडून स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मागितला आहे.मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि लिहिले की, "आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवले आहे. पाकिस्तानची दहशतवादी व्यवस्था आता कोसळणार आहे. हिंदुस्थानी सरकारने बलुचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी." ते म्हणाले की, बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी डेरा बुगतीच्या गॅस क्षेत्रांवर हल्ला केला आहे, जे पाकिस्तानच्या प्रमुख गॅस पुरवठ्याचे केंद्र आहे.मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांकडेही आवाहन केलं आहे की, संयुक्त राष्ट्रांनी ताबडतोब बलुचिस्तानात शांतता दल पाठवावे आणि आपल्या जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रातून पाकिस्तानी सैन्य हटवावे. त्यांनी मागणी केली की, पाकिस्तानी सैन्याची सर्व मालमत्ता बलुचिस्तानला सोपवावी आणि सर्व गैर-बलूच सैनिक, आयएसआय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ हा प्रदेश सोडावा. ते म्हणाले आहेत की, लवकरच एक अंतरिम बलोच सरकार स्थापन केली जाईल. ज्यामध्ये महिलांनाही प्रतिनिधित्व मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....