इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

Balochistan : पाकिस्तानचा तुकडा पडला, बलुचिस्तान आता स्वतंत्र देश; बलुच नेत्याने केली मोठी घोषणा

बलुचिस्तानने पाकिस्तानपासून स्वतःला वेगळं करत स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. राज्यात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या हिंसाचार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावरून बलुच नेते मीर यार बलोच यांनी बुधवारी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा केली. ते म्हणाले की, बलुचिस्तान पाकिस्तान नाही. त्यांनी हिंदुस्थान आणि जागतिक समुदायाकडून स्वातंत्र्यासाठी पाठिंबा मागितला आहे.मीर यार बलोच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि लिहिले की, "आम्ही आमचे स्वातंत्र्य मिळवले आहे. पाकिस्तानची दहशतवादी व्यवस्था आता कोसळणार आहे. हिंदुस्थानी सरकारने बलुचिस्तानला दिल्लीत अधिकृत कार्यालय आणि दूतावास उघडण्याची परवानगी द्यावी." ते म्हणाले की, बलुच स्वातंत्र्यसैनिकांनी डेरा बुगतीच्या गॅस क्षेत्रांवर हल्ला केला आहे, जे पाकिस्तानच्या प्रमुख गॅस पुरवठ्याचे केंद्र आहे.मीर यार बलोच यांनी संयुक्त राष्ट्रांकडेही आवाहन केलं आहे की, संयुक्त राष्ट्रांनी ताबडतोब बलुचिस्तानात शांतता दल पाठवावे आणि आपल्या जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रातून पाकिस्तानी सैन्य हटवावे. त्यांनी मागणी केली की, पाकिस्तानी सैन्याची सर्व मालमत्ता बलुचिस्तानला सोपवावी आणि सर्व गैर-बलूच सैनिक, आयएसआय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ हा प्रदेश सोडावा. ते म्हणाले आहेत की, लवकरच एक अंतरिम बलोच सरकार स्थापन केली जाईल. ज्यामध्ये महिलांनाही प्रतिनिधित्व मिळेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....