भिषण आपघात.......
दुचाकीला वाचवताना एर्टिगा कार पलटून तीन ठार तर चार जण गंभीर जखमी
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-
दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एर्टिगा कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर चार जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना आज दुपारी अंबाजोगाई आडस रोडवरील उमराई पाटी नजीक घडली.
माजलगाव तालुक्यातील पाथरूड येथून एम एच 05 सी व्ही 9186 या इर्टिगा गाडी मधून अंबाजोगाई कडे एका विवाह समारंभास उपस्थित राहण्यासाठी एक मुस्लिम कुटुंब येत असताना आडस अंबाजोगाई रोडवरील उमराई पाटील नजीक असलेल्या दत्त मंदिर समोर एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने या दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि एर्टिगा जागेवर पलटी झाली. गाडीतून प्रवास करत असलेले शौकत अहमद शेख (वय 46) व खय्युम अब्बास अत्तार (वय 45) हे दोघे जागीच ठार झाले असून आरेफ जागीरदार, नवाब मिया शेख, वाजेद आबेद मोमीन, खाजा अमीर शेख, शरीफ इस्माईल मोमीन हे पाच जण गंभीरित्या जखमी झाले असून सर्व जखमींना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आसुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान ही घटना होताच दुचाकी स्वार आपल्या दुचाकीसह घटनास्थळावरून फरार झाला असून जखमीं पैकी आणखी एका जखमीची प्रकृती चिंताजनक होती . दरम्यान उपचारादरम्यान तिसऱ्या व्यक्तीचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे पाथरूड गावावर शोककळा पसरली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा