परळीतील पवित्र घनशी आणि सरस्वती नद्यांचे संरक्षण व संवर्धन करा !
माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन सादर केले निवेदन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग स्थान परळी वैजनाथ येथील पवित्र घनशी आणि सरस्वती नद्यांची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त करुन संवर्धन करा अशा महत्वपूर्ण मागणीसाठी माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांची आज परळीचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन परळीचा महत्वपूर्ण प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथे असलेले श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे पाचवे ज्योतिर्लिंग हे अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षणीय स्थान आहे. या शहराला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे, शहराजवळून पवित्र नदी घनशी आणि सरस्वती नदी वाहतात. त्याची स्थिती घाणीने, अतिक्रमण केलेल्या जागेमुळे बिघडली आहे, ती अपवित्र केली जात आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पवित्र सरस्वती नदीचे जतन करणे खूप महत्वाचे आहे. येथील स्थानिक प्रशासनाने नदीचे नाल्यात रूपांतर केले आहे आणि याअंतर्गत सरस्वती नदी नामशेष करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. या पवित्र नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी, नद्यांचे संवर्धन आणि पुनर्संचयनाला चालना देण्यासाठी, हे उद्दिष्ट लक्षात घेऊन केंद्र सरकारमार्फत या पवित्र नद्यांच्या संवर्धन आणि संवर्धनासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा आणि या पवित्र स्थानाचे जतन करावे अशी परळीतील नागरिक आणि शिवभक्तांची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.
याबाबत प्राधान्याने लक्ष घालून हा महत्वपूर्ण व जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांनी दिले असल्याचे माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा