इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

पोलीसांचा सर्व पातळ्यांवर तपास.....!

नवा ट्विस्ट; दोन दिवसांपूर्वी परळीत एकाला उचलले; अपहरणाचा गुन्हाही दाखल मात्र खरच अपहरण की अन्य काही कारण ?

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
           गेल्या दोन दिवसांपूर्वी परळीच्या मुख्य रस्त्यावरून सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास एका इसमाला चार ते पाच लोकांनी पांढऱ्या इनोव्हा गाडीत उचलून घेऊन गेल्याचा प्रकार पुढे आला होता. याप्रकरणी अपहरण करण्यात आल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला. परळी पोलिस याचा तपासही करत आहेत. मात्र आपहरण करण्यासाठीच्या जवळपास सर्वच पैलूंची पडताळणी केली असता ठोस मुद्दा समोर आलेलाच नाही त्यामुळे आता खरोखरच हे अपहरण झाले की अन्य काही प्रशासकीय  तपास, पोलीस प्रक्रिया आदी कारणांसाठी घेऊन गेले असे तर्क वर्तवण्यात येत आहेत. तसेच असेच काहीतरी असण्याची शक्यता आहे का यादृष्टीनेही  पोलीस आता तपास करीत आहेत.
            दिनांक 06/05/2025 रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याचे सुमारास राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून पिडीत इसम नामें शेख अमजेद अहमद शेख वय 35 वर्ष रा. बरकत नगर परळी वै यास अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडुन रोडवर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या ईन्व्हा गाडी मध्ये बळजबरीणे टाकुन घेवुन गेले अशी फिर्याद देण्यात आली. यावरुन पो.स्टे.संभाजीनगर परळी वै. येथे तात्काळ गुन्ह्याची नोंदही करण्यात आली. मात्र प्रथमदर्शनी या इसमाची पार्श्वभूमी तपासली असता त्याचे आपहरण व्हावे या पातळीचे कोणतेच ठोस कारण पुढे आलेले नाही. पिडीत इसम हा टेलरकाम करणारा असल्याची माहिती मिळाली.कारागिर म्हणून टेलरिंगची कामे तो करतो.त्यामुळे या अपहरणाचे कारण शोधणे उत्सुकतेचे ठरले आहे.
        पोलीस दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सर्व बाबींची पडताळणी करत आहेत.या गुन्ह्य़ाचा जलदगतीने तपास सुरु आहे.मात्र प्राथमिक पातळीवर सध्यातरी हे अपहरणच झाले या दृष्टिने तपास सुरु असला तरी अन्य बाबींची पडताळणी व शक्यता लक्षात घेवूनही तपास सुरु आहे. दरम्यान खरोखरच हे अपहरण झाले की अन्य काही प्रशासकीय कारणास्तव, चौकशी, तपास, पोलीस प्रक्रिया आदी कारणांसाठी या इसमाला घेऊन गेले असे तर्क वर्तवण्यात येत आहेत. तसेच असे काही असण्याची शक्यता आहे का यादृष्टीनेही  पोलीस आता तपास करीत आहेत. नेमका प्रकार काय हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असले तरी पोलीस सर्व पातळ्यांवर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....