विदारक परिस्थिती....शेतकऱ्यांवर दुर्देवी वेळ....

आठ एकर पीकासोबत जमीन वाहून गेली, विवंचनेत बोरगाव येथील शेतकऱ्याने जीवन संपवले 




 नेकनुर.....सततच्या पावसाने पिके तर  गेलीच शिवाय मांजरा नदीच्या बाजूला असलेले आठ एकर पिकासोबत शेत वाहून गेल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या  केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकऱ्यांने  शेतात विजेला स्पर्श करून जीवन संपवले . रमेश ज्ञानोबा गव्हाणे वय ६२ असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

            शेतातील सोयाबीन सततच्या पावसाने कुजून गेले शिवाय मांजरा नदीच्या पाण्याने नदीकाठची उत्पन्न देणारी जमीन वाहून गेली यामुळे आता पुढे काय करायचे  यामुळे विचारात असलेल्या केज तालुक्यातील बोरगाव बु. येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा गव्हाणे  वय .62 यांनी शेतात असलेल्या विजेच्या ट्रान्सफरला जाऊन स्पर्श करीत मंगळवारी दुपारी जीवन संपवले .त्यांना केज उपजिल्हा रुग्णालयातून अंबाजोगाई रुग्णालयाकडे पाठवण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी मयत घोषित केले. बुधवारी अंबाजोगाई रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले असून बोरगाव येथे दुपारी अंत्यविधी करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !