इमेज
  नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...

 मराठी साहित्य हे पर्यावरण संवेदनेने समृद्धआहे." - प्रा.संजय आघाव




परळी , दि.२९ /१२ /२०२५ (प्रतिनिधी )

    येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगरच्या विद्यापीठ विकास मंडळाच्या मान्यतेने व अनुदानाने घेण्यात येत असलेल्या व्याख्यानमालेत बोलत असताना प्रा.संजय आघाव यांनी यावेळी "मराठी साहित्य हे पर्यावरण संवेदनेने समृद्धआहे." असे मत मांडले. साहित्यातील पर्यावरणीय जागरूकतेचे विश्लेषण करत त्यांनी यावेळी निसर्गाशी निगडित साहित्यिक कल्पना आणि समकालीन आव्हानांचा उल्लेख केला.हे व्याख्यान मराठी साहित्यातील पर्यावरण संरक्षणाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारे ठरले.यावेळी प्रा.डॉ.राजाभाऊ धायगुडे यांनी

 प्रा.वा.ल.कुलकर्णी यांचे साहित्य क्षेत्रात समीक्षक म्हणून असलेले योगदान यावर प्रकाश टाकत टाकत या व्याख्यानमालेबद्दल गौरवोद्गार काढताना, "साहित्याची सामाजिक जबाबदारी उजळणारी ही व्याख्यानमाला आहे. " असे मतही नोंदविले. प्रा. डॉ. राजाभाऊ धायगुडे यांनी यावेळी प्रा.वा.ल. कुलकर्णी यांचा वाङ्मयीन दृष्टिकोन आणि कलावादी विचार ,लेखनातील ऐतिहासिक आणि वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाचा शोध यावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा.प्रसादजी देशमुख यांनी मराठी साहित्याचे महत्त्व विशद करत त्यात प्रा.वा.ल. कुलकर्णी यांचे योगदान यावरही दृष्टीक्षेप टाकला.

      या व्याख्यानांमुळे साहित्यिक आणि पर्यावरणीय चर्चेला नवे आयाम मिळाले.जे मराठी वाङ्‌मयाच्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरले ​. श्रोत्यांनी या विषयांवर सखोल चर्चा केली आणि साहित्याच्या सामाजिक जबाबदाऱ्यावर भर दिला.

     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या डॉ. विद्याताई देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.श्याम नेरकर , प्रा.डॉ. कल्याणकर राजश्री , प्रा.डॉ. जोशी आर.एल , प्रा.डॉ.गोविंद कुलकर्णी, प्रा.डॉ.अरुण चव्हाण, प्रा.अशोक पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रकटन प्रा.डॉ.राजकुमार यल्लावाड यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!