मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त परळीत 23 जानेवारीला सर्वपक्षीय अभिवादन सभा




ठाकरे गटाच्या वतीने आयोजन; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ / प्रतिनिधी :

विश्वहिंदू हृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त परळी शहरात शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भव्य सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही अभिवादन सभा परळी वैजनाथ येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमास परळी शहरासह पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांवर तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेवर अपार प्रेम होते. “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” हे त्यांचे ब्रीदवाक्य आजही समाजाला दिशा देणारे असून, त्यांचे विचार आजही कोट्यवधी शिवसैनिकांच्या मनात जिवंत आहेत.त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित या सर्वपक्षीय अभिवादन सभेद्वारे बाळासाहेबांच्या विचारांना व कार्याला सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे परळी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी या अभिवादन सभेस आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....