संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त परळीत 23 जानेवारीला सर्वपक्षीय अभिवादन सभा




ठाकरे गटाच्या वतीने आयोजन; नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

परळी वैजनाथ / प्रतिनिधी :

विश्वहिंदू हृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त परळी शहरात शुक्रवार, दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता भव्य सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

ही अभिवादन सभा परळी वैजनाथ येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथे आयोजित करण्यात आली असून, या कार्यक्रमास परळी शहरासह पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिकांवर तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेवर अपार प्रेम होते. “२० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण” हे त्यांचे ब्रीदवाक्य आजही समाजाला दिशा देणारे असून, त्यांचे विचार आजही कोट्यवधी शिवसैनिकांच्या मनात जिवंत आहेत.त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित या सर्वपक्षीय अभिवादन सभेद्वारे बाळासाहेबांच्या विचारांना व कार्याला सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यामुळे परळी शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी या अभिवादन सभेस आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!