इमेज
  नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...

'दादांना भेटायला जायचंय' म्हणत दादांच्या आईंची पायीच धाव; काळीज हेलावणारा प्रसंग..

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या मातोश्रींची झालेली अवस्था पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.


सकाळी साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अपघाताची बातमी झळकताच, फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यावेळी दादांच्या आई टीव्ही पाहत होत्या. "अरे, दादांचा अपघात झालाय का?" अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, सत्य समजल्यास त्यांना मोठा धक्का बसेल, या भीतीने व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी तातडीने टीव्हीची केबल कापली आणि आईंचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकला.


आईंना केवळ किरकोळ खरचटल्याचे सांगून धीर देण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, लेकाच्या काळजीपोटी त्या व्याकुळ झाल्या आणि "मला दादाला भेटायला घेऊन चला" असे म्हणत फार्म हाऊसच्या बाहेर पायीच चालू लागल्या. अखेर नाईलाजाने त्यांना बारामतीतील निवासस्थानी नेण्यात आले.


अवघ्या चार दिवसांपूर्वीच, शनिवारी सकाळी साडेसात वाजता दादांनी आईची भेट घेऊन त्यांच्याशी पाऊण तास गप्पा मारल्या होत्या. शेतात नवीन वृक्षारोपण करण्याच्या सूचना देत त्यांनी कर्मचाऱ्यांचीही आपुलकीने चौकशी केली होती. नियतीच्या क्रूर घातामुळे ही त्यांची शेवटची भेट ठरली असून, राज्याने एक कणखर नेतृत्व गमावले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!