प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

'दादांना भेटायला जायचंय' म्हणत दादांच्या आईंची पायीच धाव; काळीज हेलावणारा प्रसंग..

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर त्यांच्या मातोश्रींची झालेली अवस्था पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.


सकाळी साडेआठच्या सुमारास टीव्हीवर अपघाताची बातमी झळकताच, फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. त्यावेळी दादांच्या आई टीव्ही पाहत होत्या. "अरे, दादांचा अपघात झालाय का?" अशी विचारणा त्यांनी केली. मात्र, सत्य समजल्यास त्यांना मोठा धक्का बसेल, या भीतीने व्यवस्थापक संपत धायगुडे यांनी तातडीने टीव्हीची केबल कापली आणि आईंचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकला.


आईंना केवळ किरकोळ खरचटल्याचे सांगून धीर देण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, लेकाच्या काळजीपोटी त्या व्याकुळ झाल्या आणि "मला दादाला भेटायला घेऊन चला" असे म्हणत फार्म हाऊसच्या बाहेर पायीच चालू लागल्या. अखेर नाईलाजाने त्यांना बारामतीतील निवासस्थानी नेण्यात आले.


अवघ्या चार दिवसांपूर्वीच, शनिवारी सकाळी साडेसात वाजता दादांनी आईची भेट घेऊन त्यांच्याशी पाऊण तास गप्पा मारल्या होत्या. शेतात नवीन वृक्षारोपण करण्याच्या सूचना देत त्यांनी कर्मचाऱ्यांचीही आपुलकीने चौकशी केली होती. नियतीच्या क्रूर घातामुळे ही त्यांची शेवटची भेट ठरली असून, राज्याने एक कणखर नेतृत्व गमावले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या