दोन हप्त्यांचे पैसे आले की एकाच?
परळी वैजनाथ तालुक्यात सर्वदूर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; गहू ज्वारी हरभरा टरबूज पिकांचे नुकसान
परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा...
परळी तालुक्यात सर्वदूर जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला.आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसात तालुक्यात गहू, ज्वारी, हरभरा यासह टरबुजाचे नुकसान झाले. परळी शहरात पावसाने पोलवर करंट उतरून एक शेळी दगावली आहे. तर काही ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत.
परळी तालुक्यात अवकाळी पावसाने कहर केल्याचे बघायला मिळाले. जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. परळी वैजनाथ तालुक्यातील पिंपळगाव मंडळात मोठ्या प्रमाणावर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने शिवारात झाडे, विजेचे खांब अक्षरशः उमळून पडले तर गहू, ज्वारी व हरभरा पिकालाही या पावसाचा फटका बसला आहे. गहू, ज्वारीची पिके या वाऱ्याने व पावसाने आडवी पडल्याचे चित्र बघायला मिळाले. नागापूर, धर्मापुरी, मोहा, बेलंबा, कौठळी, गर्देवाडी शिरसाळा, दौनापूर करेवाडी या सर्व पट्ट्यांमध्ये पाऊस झाला. या पावसाने गहू, हरभरा, ज्वारीच्या पिकासह टरबुजाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ऊस आणि ऊस तोडीसाठी उसाच्या फडांमध्ये आलेल्या ऊसतोड कामगारांची या अवकाळी पावसाने मोठी तारांबळ उडाल्याचेही दिसून आले.
दरम्यान, परळी शहरातील मिलिंदनगर भागात विजेचा शॉक लागून एक शेळी दगावल्याची घटना घडली आहे. मिलिंदनगर या भागातील खांबातून करंट उतरल्यामुळे बायनाबाई कांबळे यांची एक शेळी दगावल्याची घटना घडली आहे.
परळी वैजनाथ तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाली असून शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी लमान तांडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रविण पवार यांनी केली आहे. अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा अडचणीत आला. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व हरभरा काढणीस आलेले पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. परळी तालुक्यातील सर्वच गावातील तसेच लमांन तांडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गावात दारावती तांडा, वसंतनगर, मलकापूर, वैजवाडी, मोहद्रा केशवनगर या परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत. उभ्या शेतातील गहु, ज्वारी, हरभरा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाती आलेले पीक या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. शेतकर्यांचे रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभरा आदीसह अन्य पिकांचे काढा आलेले व काढणी केलेले पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करावे अशी मागणी लमान तांडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य प्रविण पवार यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा