अत्यंत गरीब परिस्थितीतून टोपीवाला मेडिकल कॉलेज (मुंबई) मधून उत्तीर्ण
विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; पतीसह सासरा व सासूवर गुन्हा दाखल
कचरु किसन घुले यांनी याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी संध्या हिचा विवाह २० मे २०२२ रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा, सोन्याचे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. लग्नानंतर काही दिवसांतच तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या पावलाने घरात यश आले नाही, असे म्हणून पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू सुनंदा कुटे यांनी तिचा छळ सुरू केला. तसेच माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत तिला मारहाण केली जात होती.
८ जून २०२६ रोजी संध्या हिचा मृतदेह कुटेवाडी शिवारातील एका शेतातील विहिरीत आढळून आला. मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने केलेल्या जखमा दिसून आल्या. सासरच्या लोकांनीच तिची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात संध्याचा पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू सुनंदा कुटे यांच्यावर खुनासह इतर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून सहा. पोलीस निरीक्षक विजय नरवाडे पुढील तपास करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा