इमेज
  परळीत ६७ व्या महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा; आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त परळी शहरात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता परळी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. धनंजय पंडितराव मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. परळीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री. अरविंद लाटकर यांनी या समारंभाचे आयोजन केले असून, त्यांनी परळी शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांना या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेला आणि हुतात्म्यांच्य...

ऊसाच्या फडात वृद्धाचा मृतदेह जळालेला अवस्थेत मिळाल्याने ममदापुर परिसरात खळबळ

 ऊसाच्या फडात वृद्धाचा मृतदेह  जळालेला अवस्थेत मिळाल्याने ममदापुर परिसरात खळबळ 



अंबाजोगाई (एमबी न्यूज वृत्त सेवा) :- अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर शिवारात आज पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत ६० वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागली. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने ही माहिती दिली. जेव्हा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ऊसाच्या सरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

            मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित (M.A.) होते आणि वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते टीबी (क्षयरोग) या आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे ते मानसिक तणावात असल्याची चर्चा गावात आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांनी स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

        शेतकरी दिलीप देशमुख यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. शेजारील शेतकरी सुरेश बुरगे यांनी शेत रस्ता अडवल्यामुळे त्यांचा ऊस कारखान्याला जाऊ शकला नाही. "रस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज देऊनही प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही. रस्ता मिळाला असता तर ऊस आधीच तुटला असता आणि ही दुर्दैवी घटना घडली नसती," असे देशमुख यांनी म्हटले आहे

मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. "आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःला पेटवून घेतले असावे असा प्राथमिक अंदाज आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल," अशी माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....