इमेज
  माणिकनगर येथे आज पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसादाचे आयोजन परळी/प्रतिनिधी परळी वैजनाथ येथील माणिक नगर, शास्त्री नगर परिसरातील महारुद्र संस्थान येथे पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त आज सोमवार दिनांक 15 जुन रोजी दुपारी 4 ते 6 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व अध्यात्मिक वातावरणात सुरू असलेल्या या पवित्र सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. हरिनाम, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा लाभ मिळत आहे.या निमित्ताने आज सोमवार, दि. 15 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.  हा कार्यक्रम महारुद्र संस्थान, माणिक नगर, शास्त्री नगर, परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह समिती, महारुद्र संस्थान यांच्या वतीने करण्यात ...

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय एकात्मतेचे शिल्पकार - रामेश्वर बचाटे पाटील 



 वडगाव स्टे : भारतातील विद्वान व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगभरात आहे आणि त्यांना ज्ञानाचे प्रतीक म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाते, भारतातील विविधता बघता या विविधतेत एकात्मता निर्माण करणे हे अवघड होते, भारतीय एकात्मतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व विविधतेला एकतेत आणले. असे मत रामेश्वर बचाटे पाटील यांनी व्यक्त केले.

 सोनपेठ तालुक्यातील वडगाव स्टे. येथे भीम नगर भागात मागील चार वर्षांपासून विविध उपक्रमांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते, यावर्षी 135 जयंती निमित्त पूर्ण आकृती पुतळ्यास सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच मान वंदना घेण्यात आली,  पंचशील धवजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना रामेश्वर बचाटे पाटील यांनी महामानवांनी जगातील संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी खूप सारे काम केलेले आहे, आणि त्यांच्या कष्टामधून पुढच्या पिढ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मिळत आहे, भारतात विविधता असताना ही एकता निर्माण करण्याचे काम संविधानाची निर्मिती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी वडगाव स्टेशनचे सर्व ग्रामस्थ व सर्व समाज बांधव उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या