इमेज
  परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा विरोधात परळीत ‘रास्ता रोको’ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.           अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला...

परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात...

महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा : परळी केंद्रातील संच क्र. ६ चा ऐतिहासिक उच्चांक - मुख्य अभियंता सुनील इंगळे




परळी औष्णिक विद्युत केंद्रात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात

परळी | प्रतिनिधी

“महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महानिर्मितीचा मोलाचा वाटा असून राज्याच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक प्रगतीसाठी अखंडित वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच सध्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे संच क्रमांक ६ ने सलग १४० दिवस पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला असून महाराष्ट्राच्या प्रगतीला महानिर्मितीची ऊर्जा प्रदान केली आहे,” असे प्रतिपादन परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी केले.ते ६६ व्या महाराष्ट्र दिन तसेच जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

परळी औष्णिक विद्युत केंद्रात गुरुवार दि. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य अभियंता सुनील इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, कामगार तसेच कंत्राटी कामगारांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन अभिवादन केले.

यावेळी बोलताना सुनील इंगळे यांनी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्या समन्वय, मेहनत आणि निष्ठेमुळेच ही उल्लेखनीय कामगिरी शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. संच क्रमांक ६ ने सलग १४० दिवस पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करून केंद्राच्या कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. भविष्यातही महाराष्ट्राच्या विकासासाठी महानिर्मिती अधिक प्रभावी योगदान देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास उपमुख्य अभियंता महेश महाजन, अधीक्षक अभियंता राजू रेड्डी, संभाजी बुकतारे, धनंजय कोकाटे, प्रसन्नकुमार गरुड, गोस्वामी, मदन पवार, सुरक्षा विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक बी. आर. अंबड, मेस्कोचे गौतम गायकवाड, वैशाली ठोंबरे, सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड, कामगार नेते हरिराम गित्ते, सोपान चौधर, बप्पा वडमारे, व्यंकटराव रामोड, के. एच. गित्ते मॅडम, ज्योती राख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गाजले यांनी केले. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परळी औष्णिक विद्युत केंद्र परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....