बीड जिल्ह्यात पुन्हा एक खून!

इमेज
  विवाहितेची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; पतीसह सासरा व सासूवर गुन्हा दाखल बीड: हुंड्यासाठी आणि चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   कचरु किसन घुले यांनी याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी संध्या हिचा विवाह २० मे २०२२ रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. लग्नात चार लाख रुपये हुंडा, सोन्याचे दागिने आणि संसारोपयोगी वस्तू देण्यात आल्या होत्या. लग्नानंतर काही दिवसांतच तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तुझ्या पावलाने घरात यश आले नाही, असे म्हणून पती पवन कुटे, सासरा आसाराम कुटे आणि सासू सुनंदा कुटे यांनी तिचा छळ सुरू केला. तसेच माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत तिला मारहाण केली जात होती.   ८ जून २०२६ रोजी संध्या हिचा मृतदेह कुटेवाड...

 जादूटोणा व फसवणूक करणाऱ्या महिलेला बीड जिल्ह्यातून ६ महिन्यांसाठी तडीपार; उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश



बीड येथील मोमीनपुरा पेठ भागातील नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या शेख नाजिया शेख पाशा या महिलेला बीड जिल्ह्यातून पुढील सहा महिन्यांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २० मे रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित महिलेवर २०१४ ते २०२४ या कालावधीत जादूटोणा करणे, नागरिकांची फसवणूक करणे यासारखे एकूण १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्या क्रूर कृत्यांमुळे नागरिकांच्या मालमत्तेला व जीविताला धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

आदेशानुसार, या महिलेला दोन दिवसांच्या आत बीड जिल्ह्याची हद्द सोडण्याचे निर्देश देण्यात आले असून, पुढील सहा महिने दंडाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही. हद्दपारीच्या काळात ती ज्या नवीन ठिकाणी राहील, तेथील जवळच्या पोलीस ठाण्यात तिला दर आठवड्याला हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सोडल्यानंतर १० दिवसांच्या आत संबंधित पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. या काळात निवडणुका आल्यास केवळ मतदानाच्या दिवशीच अटींवर जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या