ना. पंकजा मुंडे यांचा परळीत प्रभावी ‘जनता दरबार'
परळी, बीडसह जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचा जागेवर निपटारा
परळी वैजनाथ दि.०२ --- परळीसह बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करता यावे, त्यांचे जीवन कष्टमुक्त व्हावे या उदात्त हेतूने ना. पंकजाताई मुंडे या त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात ‘जनता दरबाराचे' आयोजन करतात. नेहमी प्रमाणे आजही त्यांचा भव्य जनता दरबार संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शासकीय विश्रामगृहात ना. पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार पार पडला. यात बीड जिल्ह्यातील आणि परळी तालुक्यातील असंख्य नागरिकांनी त्यांच्या समस्या व गाऱ्हाणी मांडल्या. ना. पंकजाताई मुंडे यांनी तत्परतेने प्रत्येक विषयात लक्ष देऊन संबंधित शासकीय, निमशासकीय विभागांना बोलून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार
----
ना. पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार म्हणजे समस्या मार्गी लागण्याची हमी असते. प्रशासकीय कामांसह नागरिकांचे व्यक्तिगत सुख, दुःखाचे विषय देखील पंकजाताईंच्या माध्यमातून मार्गी लागतात. शासकीय विश्रामगृहाच्या भरगच्च सभागृहातील अलोट गर्दी याची साक्ष देत होती. प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत तात्काळ संबंधिताना संपर्क करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना देऊन जागेवर त्यांनी समस्यांचा निपटारा केला. त्यांचा हा प्रभावी जनता दरबार सर्वसामान्यांचे जीवन कष्टमुक्त करण्याची अभिनव संकल्पना असल्याची भावना यावेळी नागरिक व्यक्त करत होते.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा