इमेज
  परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा विरोधात परळीत ‘रास्ता रोको’ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.           अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला...

अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार

 ना. पंकजा मुंडे यांचा परळीत प्रभावी ‘जनता दरबार'




परळी, बीडसह जिल्ह्यातील  नागरिकांच्या समस्यांचा जागेवर निपटारा

परळी वैजनाथ  दि.०२ ---  परळीसह बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करता यावे, त्यांचे जीवन कष्टमुक्त व्हावे या उदात्त हेतूने ना. पंकजाताई मुंडे या त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात ‘जनता दरबाराचे' आयोजन करतात. नेहमी प्रमाणे आजही त्यांचा भव्य जनता दरबार संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन नागरिकांचे प्रश्न सोडविले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शासकीय विश्रामगृहात ना. पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार पार पडला. यात बीड जिल्ह्यातील आणि परळी तालुक्यातील असंख्य नागरिकांनी त्यांच्या समस्या व गाऱ्हाणी मांडल्या. ना. पंकजाताई मुंडे यांनी तत्परतेने प्रत्येक विषयात लक्ष देऊन संबंधित शासकीय, निमशासकीय विभागांना बोलून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

अलोट गर्दीत प्रभावी जनता दरबार

----

ना. पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार म्हणजे समस्या मार्गी लागण्याची हमी असते. प्रशासकीय कामांसह नागरिकांचे व्यक्तिगत सुख, दुःखाचे विषय देखील पंकजाताईंच्या माध्यमातून मार्गी लागतात. शासकीय विश्रामगृहाच्या भरगच्च सभागृहातील अलोट गर्दी याची साक्ष देत होती. प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत  तात्काळ संबंधिताना संपर्क करून कामे मार्गी लावण्याच्या सूचना देऊन जागेवर त्यांनी समस्यांचा निपटारा केला. त्यांचा हा प्रभावी जनता दरबार सर्वसामान्यांचे जीवन कष्टमुक्त करण्याची अभिनव संकल्पना असल्याची भावना यावेळी नागरिक व्यक्त करत होते.


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....