इमेज
पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वीच आपल्याला दिला –भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले ! परळी वैजनाथ ।प्रतिनिधी-       वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन, नदी शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, आदी पर्यावरणीय समस्यांसाठी मानवाने सदैव जागरूक राहावे.यासाठी आता प्रयत्न होताना दिसतात मात्र पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच दिला असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर यांनी केले. परळीतील देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले आहे. भाविक कथा श्रवणात तल्लीन  होऊन जात आहेत.        पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत भागवत भक्तांसाठी हा सोहळा आध्यात्मिक मेजवानीची पर...

मग्रूर बॅंक व्यावस्थापकावर कार्यवाहीची मागणी ...

 बॅंक व्यावस्थापक विरोधात १६ जून रोजी अंदोलन 

सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या शाखे समोर बेमुदत ठिय्या अंदोलन 

सिरसाळा  :  पत्रकार,शेतकरी,नागरिक यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखेच्या व्यावस्थापक संदिप रेड्डी वर तात्काळ कार्यवाही करावी , या ठिकाणाहून बदली करावी या मागणी साठी पत्रकार मिलिंद चोपडे व इतर दिनांक १६ जून रोजी महाराष्ट्र ग्रामीण बॅंके समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहेत. या बाबत काल दिनांक ११ जून रोजी बॅंक प्रशासनास निवेदन दिले आहे.  या बाबत सविस्तर वृत्त असे कि,

केसीसी खातेदार किती आहेत ? आपल्या शाखेतील कर्जमाफीत किती शेतकरी पात्र ठरत आहेत अशी विचारणा सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा व्यवस्थापकांना पत्रकार मिलिंद चोपडे यांनी विचारली असता व्यावस्थापकाने उद्धट वर्तन करत अंत्यत मग्रूरीने थेट गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे, दिनांक १० जून रोजी पत्रकार मिलिंद चोपडे व इतर दोन शेतकरी समावेत परळी तालुक्यातील सिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेत गेले होते. या ठिकाणी उपस्थित असलेले व्यावस्थापक यांना पत्रकार मिलिंद चोपडे यांनी विचारले कि, आपल्या शाखेत किती पिक कर्जदार शेतकरी थकीत आहेत  ? पैकी किती शेतकरी महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत पात्र आहेत ? या बाबत व्यावस्थापकाने अंत्यत मग्रूरीने उद्धट करत म्हणाले कि, मि माहिती सांगू शकत नाही, या मुळे संबंध व्यावस्थापकास बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक मागितला तर संपर्क क्रमांक ही न देता या उलट तो म्हणाला कि तुम्ही बॅंकेत कसे काय आलात ? बॅंकेत यायला परवानगी लागते असे म्हणत सेवेकास बोलावून पोलीसांना बोलावण्याचे त्याने सांगत थेट गुन्हा दाखल करेल अशी धमकी सिरसाळ्यातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या व्यावस्थापकाने पत्रकार मिलिंद चोपडे यांना दिली.  संबंधित व्यावस्थापक हा येथील शेतकऱ्यांशी नेहमीच उद्धट वर्तन करतो , याच्या उद्धट वर्तनाला येथील शेतकरी ,खातेदार वैतागले आहेत. या मुळे याची तात्काळ वरिष्ठ बॅंक प्रशासनाने दखल घेऊन बदली करावी अन्यथा बॅंके समोर अंदोलन केले जाईल असा इशारा निवेदना द्वारे पत्रकार मिलिंद चोपडे सह शेतकऱ्यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या