इमेज
पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी हजारो वर्षापूर्वीच आपल्याला दिला –भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळुमहाराज उखळीकर परळीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले ! परळी वैजनाथ ।प्रतिनिधी-       वृक्षारोपण ,वृक्षसंवर्धन, नदी शुद्धीकरण, नदीजोड प्रकल्प, गंगा शुद्धीकरण, आदी पर्यावरणीय समस्यांसाठी मानवाने सदैव जागरूक राहावे.यासाठी आता प्रयत्न होताना दिसतात मात्र पर्यावरण संरक्षणाचा मूलमंत्र भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वीच दिला असल्याचे प्रतिपादन भागवतमर्मज्ञ ह.भ.प. बाळू महाराज उखळीकर यांनी केले. परळीतील देशपांडे गल्लीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित श्रीमद्भागवत कथेने वातावरण मंतरले आहे. भाविक कथा श्रवणात तल्लीन  होऊन जात आहेत.        पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त परळी वैजनाथच्या पवित्र भूमीत दगडगुंडे, पाटील व सेवलीकर परिवाराच्या वतीने सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत भागवत भक्तांसाठी हा सोहळा आध्यात्मिक मेजवानीची पर...

फसव्या कर्जमाफी निर्णयाची किसान सभेनी केली होळी

परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने

परळी वै. 12 प्रतिनिधी

 शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा, बीड जिल्हा समितीच्या वतीने गुरुवार ता 11रोजी सकाळी अकरा वाजता परळी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर निदर्शने करण्यात येऊन राज्य सरकारच्या फसव्या कर्जमाफी निर्णयाची होळी करण्यात आली. कर्जमाफी, पीकविमा, देवस्थान व गायरान जमिनी, खते-बियाणे उपलब्धता तसेच शेतकरी हिताच्या इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.


अखिल भारतीय किसान सभेच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवार ता 11 रोजी सकाळी 11 वाजता परळी कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीसमोर शेतकरी एकत्र येऊन सरकारच्या चुकीच्या शेतकरी धोरणा विरूद्ध घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी व्यापक स्वरूपाची कर्जमाफी लागू करावी, कर्जमाफीतील जाचक अटी व शर्ती रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा मिळालेला नसल्याने खरीप 2025 हंगामासाठी मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे प्रतिहेक्टर किमान 17,500 रुपयांची भरपाई देण्यात यावी, देवस्थान व गायरान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर त्या जमिनी करण्याची कार्यवाही तातडीने करावी, डीबीटी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वेळेत व पुरेशा प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध करून द्यावीत, खते-बियाण्यांमधील भेसळ, कृत्रिम टंचाई आणि चढ्या दराने होणारी विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करावी यासाठी किसान सभेने सरकारी निर्णयाची होळी करून निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ मुरलीधर नागरगोजे, कॉ पी एस घाडगे, कॉ पांडुरंग राठोड, कॉ भगवान बडे, कॉ विष्णु देशमुख, कॉ बालासाहेब कडभाने, कॉ किरण सावजी, कॉ पप्पु देशमुख, कॉ अशोक नागरगोजे, कॉ शेख इस्माईल, कॉ ब्रम्हानंद देशमुख, कॉ शंभुलिंग स्वामी, कॉ शेख खय्युम यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या