दुःखद वार्ता..... भावपूर्ण श्रद्धांजली!!!!
पुरूषोत्तम पुरीतील बोट दुर्घटना ; ना. पंकजा मुंडेंनी महिला भाविकांच्या मृत्यूबद्दल व्यक्त केली हळहळ
बीड दि. १० --
माजलगांव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना अतिशय वेदनादायी आहे, या घटनेबद्दल मी दुःख व्यक्त करते अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी हळहळ व्यक्त केली.
पुरूषोत्तम पुरी येथे सध्या अधिकमासा निमित्त राज्यभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी होत आहे. गोदावरी नदीकाठी हे मंदिर असल्याने काही भाविक बोटीतून दर्शनाला निघाले होते पण अचानक बोट उलटली आणि यात सिंदखेडराजा तालुक्यातील रहिवासी सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५ वर्षे) व सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६० वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. या अपघातात इतर काही भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे, ईश्वर दिवंगत आत्म्यांना सद्गगती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशा शब्दांत ना. पंकजाताईंनी मृत्यू झालेल्या महिला भाविकांविषयी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा