इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

MB NEWS:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉन्च केली 'स्वामित्व योजना

 आता जागेवरील मालकी हक्काबाबतचे वाद संपुष्टात येतील !



⭕पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉन्च केली 'स्वामित्व योजना', महाराष्ट्राला महिनाभरात मिळणार लाभ

 -----------------------------------     

*नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 'स्वामित्व योजना' (Swamitva Yojana) लॉन्च केली. या योजनेंतर्गंत जमिनीच्या मालकांना प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 6 राज्यातील 673 गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्यात येईल. 1 लाख 32 हजार प्रॉपर्टीधारकांना याचा लाभ मिळणार आहे. महाराष्ट्राला महिनाभरात प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. मोदी सरकारनं ग्रामीण भागाचं रुपडं पालटण्यासाठी स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचललं आहे. योजनेनुसार 1 लाख 32 हजार प्रॉपर्टीधारकांना मालमत्ता कार्ड मिळणार आहे. सुरुवातीला जमीन मालकांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे (SMS) एक लिंक पाठवण्यात येणार आहे. त्यावरून प्रॉपर्टी कार्ड डाऊनलोड करता येईल. त्यानंतर संबंधित राज्य सरकारद्वारा प्रॉपर्टी कार्टचं वितरण करण्यात येणार आहे.सुरूवातीच्या टप्प्यात या योजनेतून 6 राज्यांतील 673 गावांतील नागरिकांना लाभ मिळणार आहे. या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश- 347, हरियाणा-221, महाराष्ट्र- 100, उत्तराखंड-50, मध्य प्रदेश- 44, आणि कर्नाटक 2 गावांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ एप्रिल म्हणजेच राष्ट्रीय पंचायत दिनी 'स्वामित्व' योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा मुख्य उद्देश गावात राहणाऱ्या नागरिकांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयेगी पडणार असून जागेवरील मालकीहक्कांबाबतचे वाद संपुष्टात येतील. असं मोदी म्हणाले.शिवाय, या योजमुळे गावात राहणाऱ्या लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. एक कायदेशीर दस्तावेज म्हणून 'संपत्ती कार्ड'चा वापर करता येणार आहे. या योजनेत दिल्या जाणाऱ्या संपत्तीच्या मालकीच्या कार्डमुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.

ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी सत्तेत असलेल्या काँग्रेसवर टीका केली. याआधी सत्तेत असलेल्या पक्षाने मोठी-मोठी आश्वासनं जनतेला दिली. परंतू त्यांच्या वाट्याला कायम निराशा आली. मात्र आता 'स्वामित्व' योजनेमुळे ते आत्मनिर्भर होतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....