इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-इंग्लंडमधील इंजिनीअरच्या हाती गडदेवाडी ग्रामपंचायत गावाचा सर्वांगीण विकास करून फेडणार जन्मभूमीचे ऋण - सुशांतसिंह बळीराम पवार

 इंग्लंडमधील इंजिनीअरच्या हाती गडदेवाडी ग्रामपंचायत 



गावाचा सर्वांगीण विकास करून फेडणार जन्मभूमीचे ऋण - सुशांतसिंह बळीराम पवार



परळी (प्रतिनिधी): ग्राम पंचायत निवडणूकीत परळी तालुक्यातील गडदेवाडी या ठिकाणी सुशांतसिंह पवार या युवकाने सात पैकी चार जागा जिंकत गावची पंचायत ताब्यात घेतली.इंग्लंडमध्ये आपले कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊन आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा ध्यास घेत सुशांतसिंहने ग्राम पंचायत निवडणूक लढवली आणि जिंकली.त्यांचे वडील हे सेवानिवृत्त आय.ए.एस.अधिकारी आहेत.सर्वदूर असलेल्या परिचय आपल्या गावाच्या कामाला यावा हा ध्यास सदैव मनात घेऊन त्यांचे कार्य सुरू आहे.


आजकाल युवकवर्ग राजकाणापासून दुरवरहिलेला पहायला मिळतो.मात्र आजच्या काळात राजकरण व समाजकारण यांचा समतोल साधला तरच विकासाचा मार्ग मिळतो.हाच ध्यास मनात ठेवत अनेक ग्राम पंचायत युवकांच्या ताब्यात गेल्या. बीड जिल्ह्यातील गडदेवाडी ता.परळी या ठिकाणी

हेच चित्र पहायला मिळाले.इंग्लंड मधील नॉटींगहॅम येथे चार वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या सुशांतसिंह पवार याने गडदेवाडीमध्ये ग्रा.पं. निवडणूक लढवली. निवडणूक प्रचंड अटीतटीची झाली.गावातील जनतेनी परिवर्तनाचा चंग बांधल्याने फक्त १ मताच्या फरकाने सुशांतसिंह बळीराम पवार विजयी झाले. 


वडिल बळीराम पवार हे आय.ए.एस. अधिकारी असून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतलेली आहे.मोठे कुटुंब असताना केवळ आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी सुशांतसिंह यांनी गावात येवून पॅनल उभा केला.सात पैकी चार सदस्य निवडून आले. 

गावाचा सर्वांगीण विकास करून फेडणार जन्मभूमीचे ऋण फेडणार असल्याचे ते म्हणाले.


 - या मुद्द्यांवर करणार काम - 


मी सगळीकडे फिरलो परंतु माझे गाव आजही विकापासून दुर आहे.उसतोड कामगारांची संख्या जास्त आहे आहेत.गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे. परंतु जागेअभावी ते बांधले गेले नाही. मी आता स्वत:च्या मालकीची जागा आरोग्य उपकेंद्रासाठी देणार आहे. लहान मुलांची अंगणवाडी गावाच्या बाहेर बांधली गेली आहे. तिचे स्थलांतर गावात करणार आहोत.२०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याचा पंतप्रधानांचा संकल्प आहे. त्याची मी अंमलबजावणी करणार. वृध्द लोकांना पेन्शन मिळवून देणार. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी मी मुंबईतला मोठा व्यवसाय असतानाही गावाकडे आलो आहे असे सुशांतसिंह यांनी सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....